थोडं डोंगर व्हायचं...त्याचं झाडं बनायचं...त्याच्या अथांग आकाशात मनमस्त विहरायचं... बघायचं त्याच्याशी बोलून...पहायचं इतिहासाचं दडलेलं पाने उलगडून... त्याची आठवण काढली की तो लगेच बोलावतो...त्याच्या भेटीला! तेव्हा हळूच एखादी इतिहासातली घटना पहायचे येते का उलगडून!
Wednesday, August 15, 2012
Saturday, January 7, 2012
संत्या गेला...हास्य तरी टिकवू!
![]() | ||
| Hereafter the PIMPAL PAR of NEHRU CHOWK will feel the void of our near and dear friend in photographer V.Santosh |
त्या नव्या प्रवासात तो काय अनूभवत असेल...साल्याची तिथेही चांगली मजा असेल...आम्ही मात्र या रहाट गाड्यातल्या चाकाभोवती घुटमळत राहणार...अजुन काही काळ तरी...तसा तो इथे सुद्धा हसतमुखच जगला...
त्याचं दोन ओठ जुळवून ते पसरवत नेणारं हास्य म्हणजे एक ट्रेड मार्कच..
अगोदरच पसरट मिशी...त्यात ते हास्य भारी खुलायचं...पठ्ठ्याला कोणतं बाळकडू मिळालं होतं कुणास ठाऊक...समोर आल्या आल्या त्याच्या ट्रेडमार्क हास्याची झलक मिळायचीच...असं कुणी सांगावं की, संत्या आज समोर आला...पण आपलं ट्रेडमार्क पसरट हास्य त्याने दाखविले नाही...
संत्याचा मित्रपरिवार म्हणजे काही फार मोठा पसारा नव्हता...बहुतांशी परिसरातलेच...नेहरू चौकात निरंतरांच्या ओट्यावर आआल्यावाचून त्यांचा दिवस सरत नाही अशांपैकी संत्याही होता...माझ्या घराला खेटून निरंतरांचा वाडा असल्याने त्याचे ते पसरट हास्य मी अगणितवेळा अनुभवले आहे...
दिवाळीत माझ्या वर्कशॉपवर
दिवाळीत माझ्या वर्कशॉपवर अचानक तो सायंकाळच्या वेळेला आला होता...माझ्याशी कधी कधी फोटोग्राफीबद्दल थोडंफार बोलायचा...पण त्याने माझ्या आकाशकंदिल बनविण्याच्या छंदाचे त्यावेळी तोंडभरून कौतुक केले होते...मी मात्र का...कुणास ठाऊक त्याच्याशी आरोग्य विषयावर बोलण्यावरच भर दिला...
‘पुण्यात माझी एन्जियोग्राफी करून आलोय‘ हे सांगितले तेव्हा...तुला काय गरज...तु तर भला तंदुरूस्त दिसतोस...डॉक्टर मंडळी काहीही सल्ला देतात असं काहबाही बोलला...घरचं खावं...मुला-बाळांसोबत, कुटुंबासोबत थोडे सुखाचे क्षण घालवावे...हसत रहावे....थोडं फार जॉगिंग सकाळी करावं...आहारावर नियंत्रण ठेवावं...अशी थियरी त्याने त्यावेळी बोलून दाखविल्याचे मला चांगले स्मरते.
वीस बावीस वर्षे नाशिकच्या मेनस्ट्रीम पत्रकारितेत, त्यात बारा, पंधरा वर्षे क्रीडापत्रकारिता केल्यामुळे आणि शालेय वयापासूनच विविध खेळ खेळण्याचा, ते बघण्याचा, त्यावर लिखाण-डॉक्युमेन्ट्रीज करण्याचा आणि ओघाने क्रीडाक्षेत्रातील असंख्य व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे माझ्यावर फिटनेस, आरोग्य, आहारशास्त्र या सारख्या गोष्टींचे संस्कार घडलेत...याचा अर्थ मी फुलप्रुफ तंदुरूस्त आहे...दुडूदूडू पळत असतो असे नाही...पण तरीही एखादा हसतमुख, पापभिरू माणूस आपल्या मित्रांना न सांगता असा पुढे निघून जाणे म्हणजे कसा चटका लावते याची अनुभूती सोमवारपेठ, गणेशवाडी भागात अनेक जण अनुभवत आहेत.
...चहा घेतल्यानंतर पाणी
आपल्या माहितीचा इतरांना किती उपयोग होतो...मोठी मेणसे तर परंपराच कथन करत असतात...आणि आपली परंपरा जगात थोर...तरीही आम्ही ती का अव्हेरतो...चहा घेतल्यानंतर पाणी पित जाऊ नको म्हंटले तर आम्हाला पाणी पिण्याचा अधिकच चेव येतो...दोन आहारात पुरेसे अंतर असावे...पोट पुर्ण भरू नये...जेवताना व जेवल्यानंतर फार पाणी घेऊ नये...अंबट...गोड पदार्थांची मात्रा नियंत्रीत असावी...कडू...तुरट प्रकारांचे सेवन आवर्जुन करावे...संद्याकाळीच जेऊन घ्यावे...उशिरा जेऊ नये...न्याहारी नियमीत घ्यावी...अशा किती तरी गोष्टींचे अमुल्य सल्ले म्हणजे तर आमच्या कानावरून वार्या प्रमाणे निघुन जातात...
आपल्या पूर्वजांनी दिलेली संशोधन व अनुभवाची शिदोरी आम्ही अशी वाया घालवतो....बनतो फक्त चवीचे गुलाम...त्यामुळे ज्या चविने बटाटेवडे चघळतो...ती मजा आम्ही आईने बनविलेली कारल्याची भाजी खाताना घेऊ शकत नाही...आमच्या शरीरात पिष्टमय पदार्थांची भरपूर मात्रा जात असते...त्या तुलनेत प्रथिने...उपयुक्त आम्ल व इतर घटकांचे संतुलन राखण्याचा जाणिवपूर्वक विचार आम्ही कुठे करतो...आम्ही तर चविचे गुलाम....
...वकिलवाडीत काल गप्पांचा फड
ज्या दुधातुन मानवी शरीराला फार काही मिळत नाही ते आम्ही चांगले चाळीस रूपये लिटर दर मोजुनही आणतो...त्या चाळीस रूपयात किती भाज्या येतील...पण भाज्या म्हणून किती प्रमाणावर शरीरात जातात...खरे तर दुधाच्या...तेला-तुपाच्या रकमेत आम्हाला प्रथिने मिळविण्याचे स्वस्तातले कितीतरी स्त्रोत आहेत...सोयाबिन...मोड आलेली कडधान्ये...राजमा...चणे...हिरव्या भाज्या...असे कितीतरी स्वस्त पदार्थ...पण आम्हाला हवी असते चव...आम्ही तर चविचे गुलाम...वकिलवाडीत काल गप्पांचा फड रंगला तेव्हा फाळके फिल्म सोसायटीच्या फडक्यांनी अरब अमिरातीत त्यांच्यावर (किंवा त्यांच्या हृदयावर गुदरलेली आपबिती सांगितले...त्यानंतर अन्नपदार्थांबद्दल त्यांनी कसा दृष्टीकोण बदलला...बारा-पंधरा वर्षांपूर्वी ऍन्जियोप्लास्टी पश्चात राहणीमानात कसे बदल केले हे कथन केले...अर्थात कारण होता संत्याच...
भारतीय मंडळींनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पारंपारीक आहारपद्धतीला सोडचिठ्ठी दिली...पण खरे तर प्रत्येक ऋतुता...सणासुदिला घरात केल्या जाणार्या पदार्थांचे महत्व अनन्यसाधारण....आम्ही फक्त म्हणतो की आमचा आहार जगात श्रेष्ठ...पण खरा भारतीय आहार हल्ली घेतं कोण...प्रथिने व इतर घटकांचे शरीरात संतुलन आहे की नाही याचा विचार करतं तरी कोण...हृदयक्रीयेला अडथळा असा सहजासहजी येत नाही...नव्वद...पंचाण्णव टक्क्यांच्यावरर अवरोध असल्याशिवाय मुख्य रक्तवाहिन्यातले प्रवाह असे सहजासहजी बंद पडत नाही...ऐंशी, नव्वद टक्के अवरोध निर्माण होण्याची वाट बघण्यापेक्षा आत्ताच तपासणी करून घ्यायला हवी...आहाराकडे चव म्हणून न बघता भोजनाकडे औषध म्हणून बघितले तर...आमचेही उरलेले दिवस सुखात कटतील नाही...पुढे संत्याच्या भेटीला जायचे आहेच...पण इथला मुक्काम असा अकाली आटोपायचा का?
Thursday, February 10, 2011
व्हॉली क्रॉसिंग...
आसू...आणि हासू...
कधी मित्रांसोबत, कधी परिवारासोबत, तर कधी विविध संस्थेच्या गटांसोबत सह्याद्रीतल्या डोंगरकपारी भटकण्याचा माझा छंद गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून अव्ह्यातपणे सुरू आहे. या चंदेरी कालखंडात निसर्गाची नानाविविध रूपे अनूभवायास मिळाली; त्यातलाच एक भन्नाट अनूभव रविवारी (ता. 3 फेब्रुवारी 2011) लाभला...पण हाय रे दुर्दैव...हा आनंद तरी किती क्षणभंगूर ठरला....त्याच या कटू-गोड आठवणी...(सविस्तरवाचा ब्लॉगवर)
![]() |
Vihangam..... A group of trekkers passing through the Talwade Valley ... an angle from around 4000ft height from the Sea level ... |
Friday, August 6, 2010
अस्वस्थ करणारी अस्वस्थता
आज एक अतिशय सुंदर मुलगी आमच्या लहानग्या दुकानात आली होती. आमच्या छोट्याशा हस्तकला केंद्रावर काम करणाऱ्या दोघा मुलींशी तिची गेल्या वर्षभरापासून थोडी मैत्री जमली आहे. कालच सगळ्या जण विचारत होत्या की ती दिसत नाही हल्ली. नेमकी ती थोडं बोलायला आली आणि सगळ्यांनी तिला काल तिचीच आठवण काढल्याची कल्पना दिली. त्यावर तिचे उत्तर अस्वस्थ करणारे होते...
Monday, June 14, 2010
Monday, April 12, 2010
हा रविवार चांगलाच लक्षात राहील...
आपले शरीर हे आरामासाठी किंवा बसल्या जागी काम करण्यासाठी बनलेले नाही...त्यांची सातत्याने हालचाल गरजेची आहे...चांगला आहार घ्यावा व कोणत्या गोष्टी परिक्षाम करतात व दुष्परिणाम करतात यांची गृहिणींनी माहिती घ्यावी....त्या दृष्टीने माझ्या सौ व मुलींकरिता सुद्धा आजचा रविवार ( 11 एप्रिल, 2010) लक्षात राहणारा ठरला...
Wednesday, April 7, 2010
कुठे गेली नाशिकची थंड हवा?
- हा प्रश्न बऱ्याच वर्षांपूर्वी मागे पडला आहे. वृक्षवल्लीची अपरिमीत कत्तल, वाहनांची वाढती संख्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पडलेला विसर, यामुळे महाराष्ट्रातील इतर तप्त शहरांप्रमाणे नाशिपकची उन्हाळ्यात भट्टी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. प्रत्येक जण अंगाची तगमग कमी करण्यासाठी शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेत मिळणारे धडे प्रत्यक्षात अंमलात आणणारे हे बालक लासलगावच्या आठवडे बाजारात आपल्या आईसोबत भाजीपाला विक्रीसाठी आले ते मस्तकावर वर्तमानपत्राची टोपी चढवून. नाशिकही उन्हाळ्यात रापतं हे दाखवन देणारे हे चित्र.
Subscribe to:
Posts (Atom)
-
नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिड...
-
लग्न आणि डोंबल्यांचं हेरिटेज टूर... अंगात भिनलेली उनाडकी, ती जाता थोडीच जाईल! हा पूर्व इतिहास पक्का ठाऊक असल्याने, 'तुम्ही लग्नाला...
-
राजाची वाट त्र्यंबकेश्वरच्या जंगलात, 'घोड्याची वाट', म्हणून एक जुना घाट मार्ग आहे. १ जानेवारी १६६४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सु...


