Friday, November 28, 2008

Tribute to Ashok Kamte


दहशतीचे सावट...अनं थंडीची चादर
पॅनिक मोड : बाजारपेठेत शुकशूकाट....रस्त्यावर वर्दळ रोडावली


प्रशांत परदेशी
नाशिक, ता. 27 : शहराचे आणि थंडीचे जिवाभावाचे नाते आहे. द्राक्ष उत्पादकांना हुडहूडी भरविणारी थंडी...तीच जर बेताने आली तर त्याचा आनंद काय वर्णावा. या सप्ताहात खऱ्या अर्थाने थंडीची शाल पांघरलेल्या शहरात बुधवारी (ता. 26) सायंकाळ पासून बऱ्या पैकी कडाका जाणवला. या सुखद अनूभुतीचे काही तास उलटत नाही, तोच मुंबईवर दहशतवादाच्या बेछुट साटाची वार्ता दुरचित्रवाणीच्या माध्यमातून येऊन थडकली. गुरूवारी सकाळी शहरात थंडीची नव्हे, तर मुंबईच्या भयाण अतिरेकीकृत्याची प्रामुख्याने चर्चा होती.
भारताच्या विरोधात सर्वात मोठी दहशतवादी कारवाई म्हणून संबोधलेल्या मुंबईवरील हल्ल्याचा सकाळी पहिला दृष्य परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर जाणवला. एरवी शांत, सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिककरांनी सकाळच्या थंडीच्या कडाक्‍यातही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले खरे, परंतु मुंबईवरील हल्ल्याचा निषेध म्हणा की, भितीची छाया, मुलांना आल्या पावली घरी पाठविण्याचा सपाटा सुरू झाला होता. आजवर मुंबईत अनेक दहशत वादी हल्ले झाले आहेत, परंतू त्याचे इतके मोठे पडसाद नाशिकमध्ये प्रथमच बघायला मिळाले.
घराघरात लोक बुधवारच्या सायंकाळ पासूनच दुरचित्रवाणी वरून सुरू असलेल्या विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाला खिळून होते. त्यामुळे नाशिककरांचीगुरूवारची सकाळ थंडी पेक्षा दहशतीच्या छायेमुळे कुर्मगती सुरू झाली. शाळेत गेलेली मुले आल्या पावली परत आल्याने कामावर जाणाऱ्यांचाही उत्साह ओसरताना दिसुन आला.
हीच गत बाजारपेठांमध्ये दिसुन आली. बहुतांशी दुकाने नित्यक्रमाने सुरू झाली, परंतू ग्राहकांचा उत्साह अतिशय मंद असल्याचे शहरातून फेरफटका मारताना दिसुन आले. रस्त्यांवर दिवसभर कमालीचा शुकशुकाट होता. हल्ली ठिकठीकाणी दिसणारे ट्रॅफिक जॅम फारसे आढळले नाही.
सकाळी सकाळी नभोवाणीवरून पोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी नाशिककरांना निर्भयपणे कामकाज करण्याचा व पोलीस अतिरेकी कारवायांचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा निर्वाळा दिला होता. लोकांचे धाडस वाढविण्याकरिता रॉय यांची नभोवाणीवरची उद्‌घोषणा योग्यच होती. परंतू प्रत्यक्षात शहरात चौका चौकात पोलिसांचा म्हणावा तसा बंदोबस्त दिसुन आला नाही. मुंबईत ज्यापद्धतीने अशोक कामते, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्या सारखे बड्या अधिकाऱ्यांसह चौदा पोलिस अतिरेक्‍यांच्या गोळ्यांना बळी पडले, ते पाहता, न जाणो नाशिकवर सुद्धा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर इथल्या पोलीस, वैद्यकीय व इतर यंत्रणा सक्षम आहेत का? अशा शंका कुशंका घेऊन लोकांनी आजचा दिवस काढला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा चेहरा मोहरा बदलला आहे, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असताना आपल्या पोलीसांकडे बंदुकीच्या गोळ्यांना अवरोध करणारे पेहराव सुद्धा नाही, तिथे काठी घेऊन बंदोबस्तावरचे पोलीस काय करणार? अशा शंका या निमीत्ताने उपस्थित होत होत्या.

आठवणींना उजाळा
दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे मुंबईत अतिरेक्‍यांच्या गोळीबारात शहीद झाल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलिस व इतर सरकारी अधिकाऱ्यांत व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या आठवणींची चर्चा होती. मुंबईचे अतिरीक्त पोलिस आयुक्त अशोक कामते यांच्या आठवणी मन हेलावणाऱ्या होत्या. दोन वर्षांपूर्वी नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सर्वात ठळकपणे जाणविणारी उपस्थिती म्हणून कामतेंचे उल्लेख करता येईल.
वेटलिफ्टींग संघाचे मनोबल वाढविणारा ट्रॅकसुटमधला हा गोरापान अधिकारी, कोणी रशियन वेटलिफ्टींग प्रशिक्षक असावा! असे वाटले होते, परंतू अपघातात दोन्ही पाय गमवूनही खेळांवरची आवड तसुभरही कमी होऊ न देणारे कोल्हापूरचे छत्रपती पुरस्कार विजेता वेटलिफ्टींग व शरीरसौष्ठव संघटक विभिषण पाटील यांनी, " हे अशोक कामते साहेब, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक' अशी ओळख करून दिली. पाठोपाठ, "त्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर खेळाडूना कोल्हापूर पोलिस दलात भरती करून घेतले', अशी पुस्ती विभिषण पाटलांनी जोडली होती.
राज्या पोलीस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरला पहिले वहिले सर्वसाधारण जेतेपद मिळवून देण्याचा निर्धार करणारे कामते दिवसभर मैदानात हजर राहून आपल्या प्रत्येक संघाचे मनोधैर्य वाढविताना दिसायचे. खेळाडू हा पोलिस दलाचा खऱ्या अर्थाने दागिना मानणारे कामते, "खेळाडू पोलिसांमुळे पोलिस दलाची प्रतिमा सुधारेल व खिलाडीवृत्ती वृद्धिंगत होऊन दैनंदिन कामात तत्परता दिसुन येईल' असे मानत.

Thursday, November 13, 2008

Traditional Indian Lanterns.






Artistans from and around Nashik city indulge in creating Traditional Indian Lanterns – the Akkashkandil.
These lanterns are created on Polygon’s in various vertices viz.
1. triangle (or trigon) 3,
2. quadrilateral (or tetragon) 4
3. pentagon 5
4. hexagon 6
5. octagon 8 and is
6. Star shape
Made from bamboo, paper, wood with rich vibrant colours, and are extremly good looking. The wood is used from unpacked wooden boxes.

House wives dedicate their extra time for this activity. And This is a great process of recycling and the lanterns consume very little power.


- This Year (08) Maiga Lanterns’ were almost inseparable part of Nashik’s Cultural events. Almost all famous Classical and Light classical musical concert stage were decorated with Maiga Lanterns.

Wednesday, September 17, 2008

बहर वेडावणारा; ऱ्हास दुखावणारा


त्र्यंबकेश्‍वरजवळील उतवड किल्ल्यालगतच्या डोंगरावरील कार्वीची दिव्य फुले. (छायाचित्र : प्रशांत परदेशी)
कार्वीची फुले

डोंगरदऱ्यांचे रहिवासी असो, की कडेकपारीत भटकणारे निसर्गवेडे. कार्वीचे त्यांच्याशी अतूट नाते आहे. सह्याद्री तर कार्वीचा शृंगार अभिमानाने अंगाखांद्यावर मिरवतो. दिसायला एक साधारणसे झुडूप; पण तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काही फुटांपर्यंत सरळसोट वाढणाऱ्या काड्या आतून पोकळ. त्यामुळे ती वाहून न्यायला हलकी; पण कार्वीची गुणवैशिष्ट्ये इथेच संपत नाहीत. शेणामातीत सारवलेल्या कार्वीच्या झोपड्या, लहान हॉटेल, ढाबे मनाला भुरळ घालतात. दुर्गम, अतिदुर्गम भागात तर जिथे जिथे कार्वी उपलब्ध असेल तिथे घरांना ती पहिली पसंती असते. बाहेर उष्णता असेल तेव्हा कार्वीची घरे आतून थंड असतात आणि हिवाळ्यात उबदार.
या कार्वीची गंमत म्हणजे तिचा बहर आठ वर्षांतून एकदाच येतो. तो बघायला मिळणे एक अवर्णनीय आनंद. जांभळ्या रंगाची फुले जास्त पावसात कोमेजतात; पण ताजीतवानी असतात तेव्हा सूर्याचा प्रकाश साठविल्याचा आभास होतो. 2005 मध्ये सह्याद्रीत अनेक डोंगरांत कार्वीचा महाबहर आला होता. काही ठिकाणचा बहर मात्र उशिरा असल्याने अधूनमधून भटकंती करताना कार्वीच्या फुलांचे दर्शन घडत असते. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांत भटकण्याचा योग आला तेव्हा उतवड किल्ल्याचे काही कडे जांभळ्या दिव्य फुलांनी लगडल्याचे दिसून आले. हा दुर्मिळ बहर अगदी अल्प प्रमाणावर असला, तरी वेडावून टाकणारा आहे.
माणसाला मायेची ऊब व थंडावा देणारी कार्वी डोंगरांचीही तारणहार आहे. वेगवान वाऱ्यात, ऊन-पावसाचे थपेडे झेलत ती उभी राहते. तिची मुळे डोंगराची माती घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे अनेक डोंगरांचे माथे कार्वीचा आधार घेऊन उभे आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या संशोधकांनी माथेरान व त्र्यंबकेश्‍वरला ब्रह्मगिरी पर्वतावरून कार्वीचे नमुने गोळा केले. आदिवासी कार्वीच्या मुळांचा वापर औषधासाठी करतात. त्यावर प्रयोगशाळेत यशस्वी प्रयोग केल्याचे निष्कर्ष संशोधकांनी मांडले.
घरांसाठी व सरपण म्हणून कार्वीची बेसुमार कत्तल झाल्याने आता कार्वीच्या संरक्षणाची वेळ येऊन ठेपली आहे. तळावरच्या जंगलांचा सफाया झाल्याने डोंगरमाथ्यावरची कार्वी दुष्टचक्रात सापडली आहे. त्यामुळे एकेकाळी सर्वत्र आढळणाऱ्या या बहुगुणी झुडपाचे अस्तित्व संकटात सापडले आहे. सह्याद्रीत काही मोजक्‍या ठिकाणी कार्वी दाटीवाटीने उभी आहे. काही ठिकाणी तर दोन्ही हातांमध्ये मावणार नाहीत, इतके जाड बुंधे दिसून येतात.
ग्रामीण भागातल्या समस्यांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. पीकपाण्याची अनिश्‍चितता, शिक्षणाचा अभाव, नोकरीची संधी नाही, घरासाठी बांधकाम साहित्य नाही, जाळायला इंधन नाही, अशा स्थितीत निसर्गसाखळीतले कार्वीसारखे साधारण झुडूप उच्चाटनाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. कार्वीचा ऱ्हास ही दुर्गम भागातील सामाजिक, आर्थिक स्थितीची भीषणता दर्शविणारी अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. विकासाची गंगा "त्यांच्यापर्यंत' पोचत नाही म्हटल्यावर कुठले पर्यावरण, कुठले संवर्धन? आलिशान जीवन जगणाऱ्या शहरी अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी व संस्थांनी पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमा जरूर काढाव्यात; पण ज्या जनतेचे जीवन कस्पटासमान झाले आहे त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या किमान सुविधा तरी उपलब्ध करून द्यायला हव्यात.
मुंबईत एखादा पूल झाला नाही तरी चालेल; पण खेड्यापाड्यांत विकासाची एक योजना जरी नीट कार्यान्वित झाली नाही, तरी त्याचा पहिला परिणाम कशावर होईल? निसर्गावर... हा निसर्ग राखला नाही, तर माणसांना पाणी कोठून मिळेल? शेतीला पाणी कोठून मिळेल? लहान-मोठे जीवजंतू तहान कोठून भागवतील? कार्वीवर कोसळलेले आरिष्ट पर्यावरण संतुलन बिघडल्याचे एक जळजळीत उदाहरण ठरावे.

Monday, September 3, 2007

The Quiet Ganga-Godavari in her full swing…

- She is the ultimate peace…
a few minuets spent by her side are always reliving.
On a quiet Shravan eve She was flowing in full swing
blessing all the tourists and devotees.

Thursday, August 2, 2007

Highschool graveyard ?


In a way, this is encroachment; though technically the Stadium complex shopping center of Nashik is a sanctioned project.

I was a school child, when we use to play lots of games on the High School Ground, as it is called. Like me, this stadium has shaped many youths of Nashik.

Since last one and a half decade, the High School Ground is digging its owe crematory year by year, thanks to our political will, that has succeeded in transforming this last remaining open space into a grave.

The illegal owner of this place, the Zilla Parishad is inching towards transforming the High School Ground into a commercial place.

They have illegally shifted their departments in the stadium premises, where as court has clearly mentioned that that cannot any other activity on this ground except Sports.

ZP dose not possess capacity to run any kind of sporting activity on this prime land of Nashik. The spots associations of Nashik are not united to fight for the cause of sports in the stadium, nor they are strong enough to conduct sports training.

The stadium will turn into childrens graveyard!
What if a city transforming into metropolis, dose not have open space to nurture the young generation? The youth will be diverted towards crime, sex and indiscipline.

Monday, July 9, 2007

Life is Joy N’joy it!


Dear Friends,

I welcome you all on this stage.
It is ment purely to promote friendship,

-Friendship - a blessing for mankind.

If 'this single word'
would not have been there!

Imagine!
-life on this planet would have been
Incomplete, meaningless.

'Come and share your experiences',
'Exchange all the funny, humorous,
comic as well as satirical movements
you have experienced'.

After all, enjoyment is all that matters.

-No wonder what work you do,
If you are not able to enjoy it,
it is going to be a burden,
it's going to create lethargy.

One should not do, what dosen't
give him JOY.
Life is Joy N’joy it!