- हा प्रश्न बऱ्याच वर्षांपूर्वी मागे पडला आहे. वृक्षवल्लीची अपरिमीत कत्तल, वाहनांची वाढती संख्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पडलेला विसर, यामुळे महाराष्ट्रातील इतर तप्त शहरांप्रमाणे नाशिपकची उन्हाळ्यात भट्टी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. प्रत्येक जण अंगाची तगमग कमी करण्यासाठी शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेत मिळणारे धडे प्रत्यक्षात अंमलात आणणारे हे बालक लासलगावच्या आठवडे बाजारात आपल्या आईसोबत भाजीपाला विक्रीसाठी आले ते मस्तकावर वर्तमानपत्राची टोपी चढवून. नाशिकही उन्हाळ्यात रापतं हे दाखवन देणारे हे चित्र.
थोडं डोंगर व्हायचं...त्याचं झाडं बनायचं...त्याच्या अथांग आकाशात मनमस्त विहरायचं... बघायचं त्याच्याशी बोलून...पहायचं इतिहासाचं दडलेलं पाने उलगडून... त्याची आठवण काढली की तो लगेच बोलावतो...त्याच्या भेटीला! तेव्हा हळूच एखादी इतिहासातली घटना पहायचे येते का उलगडून!
Wednesday, April 7, 2010
कुठे गेली नाशिकची थंड हवा?
- हा प्रश्न बऱ्याच वर्षांपूर्वी मागे पडला आहे. वृक्षवल्लीची अपरिमीत कत्तल, वाहनांची वाढती संख्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पडलेला विसर, यामुळे महाराष्ट्रातील इतर तप्त शहरांप्रमाणे नाशिपकची उन्हाळ्यात भट्टी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. प्रत्येक जण अंगाची तगमग कमी करण्यासाठी शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेत मिळणारे धडे प्रत्यक्षात अंमलात आणणारे हे बालक लासलगावच्या आठवडे बाजारात आपल्या आईसोबत भाजीपाला विक्रीसाठी आले ते मस्तकावर वर्तमानपत्राची टोपी चढवून. नाशिकही उन्हाळ्यात रापतं हे दाखवन देणारे हे चित्र.
Friday, February 19, 2010
Holi with Ayurvedic Colors
the eco friendly culture of INDIA
Ancient scriptures like the Rig-Veda and the Gaduda Purana mention this ritual of people sprinkling colours on each other. They played with gulal - powder made out of spring blossoms, leaf and fruit extracts. The red was Raktachandan (Pterocarpus santali-nus); the green was blended Mehendi and the yellow was dried Amaltas (Cassia fistula) and Marigold / Gainda (Tagetus erecta).
Wednesday, February 17, 2010
जिव्हाग्री टेकलें कवींठ
---
नाशिक, ता. 11 : गेल्या काही दिवसांपासून शेतांमधली कवठाची झाडे भरगच्च फळांनी लगडली आहेत.
कैंसें एकचि केवढें पसरलें। त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकलें ।।
जैसें कां कवींठ घातलें। वडवानळीं।।(एकच मुख-कसे व केवढे पसरले आहे? ज्या प्रमाणे वडवानळामध्ये कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्हींही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात.)भारतीय संस्कृतीमध्ये वनमहात्मय धार्मिक आणि तात्त्विक विचारसरणीमध्ये जोपासले आहे. श्लोक 30मध्ये ज्ञानेश्वर माऊंलींनी सर्वव्यापी श्रीकृष्णाची तुलना करताना कवठाच्या अविट गोडीची महत्ती सांगितली आहे.
संस्कृतमध्ये कपित्थ, हिंदीत कैथा किंवा कैथ बेल, बंगालीत कोंथ बेल अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कवठाला इंग्रजीत वुड ऍपल म्हणतात.
Wednesday, January 27, 2010
उत्साह वाढवताहेत बक्षिसे...अन् शुभेच्छा!
इतिहासाची पुनरावृत्ती;
ध्यानी मनी नसताना एखादी घटना घडते..."तुम्हाला राजीमाना द्यावा लागेल'...असे शब्द कानी पडतात...चुक नसताना आलेले हे बालंट नोकरी जाण्याच्या भावनेपेक्षाही जास्त बिकट...असा प्रसंग मी 2009 साली अनुभवला होता...आज त्यात घटनेचा पुढचा अंक...या वेळचा प्रसंगी मात्र सर्वस्वी निराळा...ज्या घटनेमुळे माझी नोकरी जाण्याची पाळी आली होती, त्याच प्रसंगात यंदा मी बक्षिसाचा मानकरी ठरलो.
Thursday, December 31, 2009
कृपया हे कधीही करू नका :

Always face the ROCKNashik, 30 December 2009 : "आपण निसर्ग यात्री आहोत', "इतिहासाचे आपल्याला ज्ञान आहे', "आपल्या महान संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे', असा समज जर कोणाच्या मनात निर्माण होत असेल तर त्यात काहीही गैर नाही, परंतू याचा गिरीभ्रमणाशी संबंध येतो कुठे? डोंगराचे काही नियम असतात, त्याठिकाणी छोटासा अपघातही परवडण्यासारखा नसतो....
Friday, December 25, 2009
""रान मोकळे मोकळे, बघे भरून नभास त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास''

- कमी पावसामुळे बळीराजा धास्तावलाय, शहरी माणसाला चिंता पाणी वर्षभर पुरेल की नाही याची. या चिंता विसरायच्या तर त्या पावसाच्या, त्या नभाच्या भेटीला जाणेच इष्ट. वरुणराजाने किमान डोंगरांच्या कडेकपारी हिरव्या करून सोडल्यात आणि माणसाला निसर्गाचा समतोल बिघडू देऊ नका, नाही तर तुमचाच तोल बिघडेल, असा इशारा दिला आहे.
त्र्यंबकेश्वरची इतिहासप्रसिद्ध ब्रह्मगिरी प्रदक्षिणा

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, अवघे दोन किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या त्र्यंबकनगरीत इतक्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाची तारांबळ उडते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही साडेतीन लाख भाविकांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे...
.
Nashik, 8 August 2009 :
नाशिकपासून 28 किलोमीटरवर असलेले त्र्यंबकेश्वर कितीतरी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अवघे दोन किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या, तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या इवल्याशा नगरात आध्यात्मिक, ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्रात इतक्या गोष्टी घडून गेल्या आहेत, की त्यांची नोंद ठेवणेदेखील मुश्कील.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर. मूळ गंगा-गोदावरीचे जन्मस्थान. बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा जगप्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरुबंधूंना नाथ संप्रदायाची दीक्षा गहिनीनाथांकडून येथेच प्राप्त झाली. पुढे वारकरी संप्रदायाचा पाया याच ठिकाणी रचला गेला. नाथांनी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या आनंदाला येथे वर्षातून दोनदा निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा व उटीच्या वारीच्या निमित्ताने उधाण येते.
गौतम ऋषींनी न्यायशास्त्र या सांख्य दर्शनावरील अलौकिक ग्रंथाची रचना येथे केली. गीतेत कृष्णाने कथन केलेल्या सांख्य दर्शनाचे प्रणेते कपिल महामुनींचा आश्रम या नगराच्या सीमेवर आजही आहे.
इथल्या बोहाड्याने भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना चित्रपट निर्मितीची प्रेरणा दिली. अशाप्रकारे त्र्यंबकेश्वर नगरात भारतीय चित्रपटसृष्टीचा श्रीगणेशा झाला. अशा कितीतरी गोष्टी त्र्यंबकनगरीत घडल्या आहेत.
ब्रह्मगिरी पर्वतावरील पाच शिखरे तत्पुरुष-अघोर-इशान-वामदेव-सद्योजात म्हणजे पाच नद्यांचे उगम स्थान. त्यात गोदावरी व वैतरणा या प्रमुख नद्या. या नद्यांचे उगमस्थान तितकेच अद्भुतरम्य. हिरवाईने नटलेले डोंगर, त्यातून वाहणारे असंख्य झरे, धबधबे बघून मन हरखून जाते.
सृष्टीचा हा ठेवा मनात साठविण्यासाठी, निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या भावंडांनी ज्या वाटेवरून शिवशंकराला साद घातली त्या मार्गाची अनुभूती घेण्यासाठी, जेथून गोदेने पृथ्वीवर प्रवेश केला ते ठिकाण बघण्यासाठी या श्रावणातल्या तिसऱ्या रविवारी व सोमवारी लाखो भाविकांचे स्वागत करण्यासाठी त्र्यंबकनगरी सज्ज झाली आहे.
गेल्या काही वर्षांत प्रदक्षिणेत हुल्लडबाजांचे प्रस्थ माजल्याने प्रदक्षिणेच्या बदलत्या स्वरूपावर अलीकडे टीका होऊ लागली आहे. प्रदक्षिणेच्या काळात भांग, चरस, गांजा आदी अमली पदार्थांचा वापर "भोले'चा प्रसाद या नावाखाली वाढल्याने त्याबद्दल टीका होऊ लागली आहे. त्यामुळे काही घरंदाज मंडळी तिसऱ्या सोमवारची गर्दी टाळण्यासाठी श्रावणातील इतर सोमवार निवडू लागले आहेत. त्यामुळेच म्हणून की काय दुसऱ्या सोमवारी दीड ते पावणेदोन लाख भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. तरीही तिसऱ्या रविवारी अडीच ते तीन लाख भाविकांच्या उपस्थितीचा प्रशासनाचा अंदाज आहे.
20 मैल प्रदक्षिणेबरोबरच 40 मैलाच्या प्रदक्षिणेला मोठी गर्दी लोटण्याची शक्यता असून, प्रशासनाने भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रदक्षिणा करण्याचे आवाहन केले आहे. खासगी वाहने नेण्यास बंदी करण्यात आली असून, तळवाडे, तळेगाव, अंबोली, पहिने बारी येथे पार्किंगची खास सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणाहून "एसटी'च्या विशेष फेऱ्या भाविकांची ने-आण करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. सिंहस्थाच्या धर्तीवर छोटेखानी व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन करू नये. महिला, मुले व वृद्धांना धक्काबुक्की होणार नाही, प्रवासात त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्र्यंबकेश्वरमधील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
अनेक भाविक रविवारी रात्री प्रदक्षिणेला सुरवात करतात. त्यामुळे वाटेत आदिवासी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अनेक जण काटेरी कुंपण तोडून अंधारात भरकटतात. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. काही मंडळांतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते; परंतु प्लास्टिकचे द्रोण, ग्लास व पाण्याच्या बाटल्यांचे खच इतस्तत: पसरून प्रदूषण वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन निसर्गप्रेमींतर्फे करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला घृष्णेश्वराकडे जाताना सतावल्यावाचून राहणार नाही... हे ...
-
नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिड...
-
माहुली: गुप्त राजधानी ब्लॉगमध्ये वाचा... - माहुलीची रविवारीय भटकंती - शहाजींचे युद्ध - शिवाजींचे युद्ध आपल्या माथ्यावर सुळक्या...