Thursday, November 22, 2012

पर्यटन विकास: गड-कोटांच्या सत्वाची पुन्हा कसोटी!

किल्ले चंद्राई (चांदवड): अफाट खर्चाचा गाडीरस्ता
नाशिक, २१ नोव्हेंबर २०१२: `पर्यटन', हा शब्द अगदी सुटसुटीत आहे. त्यावरून इतका गोंधळ कसा होतो.  मला पर्यटन विकास हा शब्द कमालीचा अस्वस्थ करू लागला आहे, जेव्हा पासून तो गडकिल्ल्यांवर जाऊन पोहोचलाय. गावकुसातील पर्यटनस्थळा प्रमाणेच ही मंडळी गडकिल्ल्यांवरच्या पर्यटनाकडे बघु लागल्याने डोंगरच्या डोगर फोडले जाऊ लागलेत...डोंगरकडांवर कैक मिटर, किलोमिटर लांबीचे रेलिंग पाईप बसविले जाऊ लागलेत...गरज नसतना सौर दिवे...सिमेंट कॉंक्रिटच्या पायर्‍या...जिथे वर्दळच नाही अशा ठिकाणी घाट बांधले जाऊ लागलेत...हा आपल्या इतिहासावर, गडांच्या अस्तित्वार घाला तर आहेच, शिवाय जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी आहे...अशा प्रकारचे पर्यटन म्हणजे महाराष्ट्राला जडलेला रोग, त्याचा मी संक्षिप्तपणे वेध घेत आहे. तज्ज्ञांनी, अधिकार्‍यांनी, चळवळ्यांनी तो सखोलपणे घ्यावा ही अपेक्षा!

किल्ले चंद्राई (चांदवड): चंद्रेश्वर मंदिरापर्यंत भलामोठा घाट बांधण्यात आला आहे...
थेट वरपर्यंत गाडी नेण्याची सुविधा! कशासाठी? त्याठिकाणी ना गडाचे अवशेष ना खिळवून
 ठेवू शकेल, असे निसर्गसौदर्य ना जुन्या काळच्या खाणाखूणा...
रामसेजवर रात्रीच्या वेळी कोण फिरायला जाणार. पण जिल्हा प्रशासनाने भरपूर प्रमाणात लाईट लाऊन ठेवले. रात्रीच्या वेळी कुठली माणसे या सहज सोप्या गडावर जातील. तिथे पार्ट्याच होणार, दुसरे काही नाही.
किल्ले रामसेज: आता त्यावरचे सौर पॅनल, बॅटर्‍या,
 इतकेच नव्हे तर लाईट सुद्धा गायब आहेत...जिथे कोणत्याही 
संरक्षणाची व्यवस्था नाही...वीजेच्या दिव्यांची अजिबात गरज नाही...
अशा ठिकाणी हा लाखोंचा खर्च अनाठायी आहे....
किल्ले चंद्राई (चांदवड): सिमेंटच्या पायर्‍या
किल्ले रामसेज: सिमेंटच्या पायर्‍या
किल्ले रामसेज
नाशिकमध्ये दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या किल्ले रामसेजवर पर्यटन केंद्र उभारण्याची घोषणा पालकमंत्री, जि्ल्हाधिकार्‍यांनी केली आहे. त्याचे `दृष्ट' परिणाम, रामसेजगडावर गेल्यास दिसू शकतील. चांदवडच्या चंद्राई किल्ल्यावर नुकतीच भेट देऊन आलो, तिथल्या पर्यंटन विकासाची झलक मी सचित्र पेश करणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक शिलालेख व भरपूर प्रमाणावर जुने बांधकाम शिल्लक असलेल्या मालेगाव जवळच्या गाळणा किल्ल्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचे घाटत आहे. दुर्गम मार्कंडेय पर्वतावर पर्यटन विकास करण्याची मागणी समोर आली आहे. शिवाजी महाराजांनी महिनाभर वास्तव्य केलेला पट्टा, अर्थात विश्रामगड, प्राचिन इतिहासाचा अमुल्य ठेवा जोपासणारा किल्ले हरिश्चंद्रगड आदी ठिकाणी पर्यटक केंद्र साकारण्याच्या बातम्या वाचण्‌यात आल्या आहेत.
प्रदक्षिणा
अती प्राचीन अशा प्रदक्षिणा मार्गाची अवस्था यंदा बघायला मिळाली. एखाद्या हार्ट पेशंटला सुद्धा आता फेरी मारता येऊ शकते. आपल्या एसी कारमध्ये ड्राईव्हरला गाडी सुरू करायला सांगायची, पायी ठेचकाळत चालणार्‍यांना टाटा करत अगदी आरामात प्रदक्षिणा पूर्ण करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करून ठेवली आहे.

आपण अगोदर पर्यटन हा शब्द जाणून घेऊ या...
दैनंदिन कामकाज करणारे व्यवसायिक, नोकरदार, गृहिणी किंवा वर्षभर अभ्यास करणारे विद्यार्थी, खेळाडू यांना हवापालट करण्याची गरज भासते. कुठेतरी लांबवर जाऊन यावे. तिथली प्रेक्षणीय स्थळे बघावीत. तिथल्या भोजनाचा आस्वाद घ्यावा. जमल्यास काही शॉपिंग करावे, थोडा किंवा भरपूर आराम करावा या दृष्टीने पर्यटनाला जातात. (सद्या धार्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, व्यावसायानिमीत्त केले जाणारे पर्यटन बघायला मिळते.)
आरामाची गरज

पर्यटकाला मुळात आरामाची गरज असते. कुटुंब कबिला घेऊन किंवा मित्र, सहकारी सोबत घेऊन तो बापुडा जीव कामाचा ताण हलका करण्याकरिता कुठे तरी जात असतो. त्याला मानसिक विश्रांती हवी असते, व शरीराला सुद्धा फार श्रम देण्याची तयारी नसते. व्यावसायिक हंगाम संपल्यानंतर, संशोधन पुर्ण केल्यानंतर किंवा एखादा मोठा कार्यक्रम पार पाडल्यानंतर सुद्धा लोक पर्यटनाला जातात. मोठ्या निवडणूकीनंतर सुद्धा अशीच सुट्टी घालविली जाते. त्यात उमेदवार, त्याचे पाठीराखे, कार्यकर्त्यांचा समावेश होतो.

...तर अशा पर्यटनासाठी आपल्या आजुबाजुच्या परिसरात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. जगभरात तुम्ही पर्यटनाला कोठेही जाऊन येऊ शकतात, तुमच्या क्षमते प्रमाणे तुम्हाला अमर्याद पर्यटनाची संधी आहे. स्वत:च्या वाहनाने असेल किंवा एखाद्या टूर ऑफरेटरच्या मार्फत लोक सर्वदूर फिरून येतात.

आपल्याकडे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास नावाचे शासकीय महामंडळ आहे. प्रत्येक ठिकाणी या मंडळाचा व्याप आहे. अधिकारी, नोकरचाकर, कार्यालये, निवास संकुल, भोजनगृह असा सर्व व्याप सांभाळून आहे. लोकप्रिय ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक ठिकाणी पर्यटन विभागाने लोकांकरिता स्थल दर्शन, निवास, भोजन व प्रावासाच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.  बुकिंगच्याही सुविधा आहेत. आपल्याकडे ना पर्यटन स्थळांची कमी आहे, ना पर्यटकांची.

पर्यटनाचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की, एखाद्याने महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरण्‌याचे उद्दीष्ट ठेवले तरी त्याला दहा-पंधरा वर्षे सुद्धा पूरणार नाहीत.  असे असताना त्यात आता वनविभाग व स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालये उडी घेऊ पाहत आहेत. पर्यटकांकडून तिकीट रूपाने काही रक्कम वसूल करायची. लोकांना आकर्षित करायचे व भरपूर उत्पन्न मिळवायचे असा त्या मागचा दृष्टीकोण! इतके दिवस जमिनीवरच्या स्थळांना प्राधान्य देणार्‍या पर्यटन विकास मंडळाने आपला मोर्चा आता डोंगरांवरील, दूर्गम ठिकाणांकडे वळविला आहे. म्हणे महाराष्ट्रातल्या दिडशे किल्ल्यांचा विकास करणार.
सिमेन्टच्या पायर्‍या
रामसेज किल्ला, हजार फुट उंचीचा असेल. त्यावर सिमेन्टच्या पायर्‍या तयार करण्यात आल्या. सौर उर्जेवर चालणारे दिले रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात आले. या गडाचा इतिहास दैदिप्यमान आहे. मराठ्यांनी मोगली फौजांना चांगले तीन वर्ष जेरीस आणले, पण त्यांना गड काही घेता आला नाही. २५,००० (पंचवीस हजार)ची फौज जेरीस आली, शेवटी त्यांना नाद सोडावा लागला. औरंगजेब कमालीचा चढफडत राहिला. शौर्याचे प्रतिक असलेल्या रामसेजवर रात्रीच्या वेळी कोण फिरायला जाणार. पण जिल्हा प्रशासनाने भरपूर प्रमाणात लाईट लाऊन ठेवले. रात्रीच्या वेळी कुठली माणसे या सहज सोप्या गडावर जातील. तिथे पार्ट्याच होणार, दुसरे काही नाही.

डोंगरांवरच्या अशा पर्यटन स्थळांचा रखरखाव काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी  मोठा कर्मचारी वर्ग लागणार. त्यांचे पगार-पाणी, वीज-पाण्याचा खर्च करायचे म्हंटले तर, सरकारला त्यापोटी फार उत्पन्न सुद्धा मिळणार नाही.
कैक किलो मिटर लांबीचे रेलींग
मला वाटतं, ज्याठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर पुरातत्वीय महत्वाचे अवशेष नाहीत, अशा ठिकाणी कैक किलो मिटर्सचे रेलिंग बसविणे. गडावर जाण्यासाठी अफाट खर्च करून मोटरगाडीचा पक्का रस्ता तयार करणे हे वायफळपणाचेच नव्हे, तर मुर्ख पणाचे लक्षण आहे...पण अधिकारी काही मुर्ख नाहीत, तेव्हा त्यांना त्यातून भरपूर कमाई मिळत असल्यामुळेच हा अनाठायी खर्च करण्यात आला आहे.
चांदवडच्या एतिहासीक किल्ल्याच्या पायथ्याला ५०० फुट उंचीवर
 असलेल्या या कड्यावर इतके भव्य पाईपचे रेलिंग कशासाठी 
लावण्यात आले...त्याठिकाणी सप्तश्रृंगी गडासारखी किंवा 
मांढरादेवी सारखी मोठी गर्दी कधी उसळत नसते...मग 
येथे कोणाचे नियंत्रण करणार?

चांदवाडच्या चंद्राई किल्ल्यावर कैक किलो मिटर लांबीचे रेलींग बसविण्यात आले आहे. जणू  लाखोंच्या संख्येने जनता गडावर जाणार व रेटारेटी करून डोंगरावरून खाली कोसळणार? मला वाटतं, ज्याठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर पुरातत्वीय महत्वाचे अवशेष नाहीत, अशा ठिकाणी कैक किलो मिटर्सचे रेलिंग बसविणे. गडावर जाण्यासाठी अफाट खर्च करून मोटरगाडीचा पक्का रस्ता तयार करणे हे वायफळपणाचेच नव्हे, तर मुर्ख पणाचे लक्षण आहे...पण अधिकारी काही मुर्ख नाहीत, तेव्हा त्यांना त्यातून भरपूर कमाई मिळत असल्यामुळेच हा अनाठायी खर्च करण्यात आला आहे.

गडावरच्या महानिर्वाणी आखाड्याला त्यानिमीत्ताने लॉटरी लागली म्हणायची. आता त्यांनी तिथे मोठ मोठे सभामंडप थाटले आहेत. एक गोष्ट पक्की ध्यानात घ्यावी, की या ठिकाणी सिमेंट ओतणे सोपे आहे. पण पाऊस, वारा व प्रखर ऊन्ह पाहता, आजकालची बांधकामे फार तग  धरणार नाहीत. खुप जास्त पुरातत्वीय अवशेष नसल्याने दूरदेशीच्या पर्यटकांची येथे झुंबड उडणार नाही, हे नक्कीच. त्यामुळे स्थल दर्शनातून सरकारला फार तुटपुंजे उत्पन्न मिळू शकेल.

महाराष्ट्रात आणखी दिडशे किल्ल्यांचा अशा प्रकारे जिर्णोद्धार केला जाणार आहे. त्याठिकाणच्या पुरातत्वीय अवशेषांची देखभाल करा. ढासळलेरे दगडी बुरूज, पायर्‍या. भिंती, मंदिरांची डागडूजी करा हवे तर, पण तिथे सिमेंटच्या पायर्‍या व लाईट आणने अप्रस्तुत आहे. त्याचा उपयोग मद्य प्रासनासाठीच अधिक होईल. नाहीतरी दुर्ग अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक, संशोधक हे दिवसा उजेडातच आपले निरीक्षण करतात. रात्री हवं, तर मुक्काम सुद्धा करतात, पण त्यासाठी इतका खर्च करण्याची गरज नाही. कारण तळमणीचे अभ्यासक, असोत, जिज्ञासू असोत, की भाविक, त्यांना स्थळ भेटीत जास्त रस असतो. तिथल्या सुखसोयीत नाही.
वाईट प्रवृत्तीचाच शिरकाव
पुरातत्वीय अवशेषांची देखभाल करा. ढासळलेरे दगडी बुरूज, पायर्‍या. भिंती, मंदिरांची डागडूजी करा हवे तर, पण तिथे सिमेंटच्या पायर्‍या व लाईट आणने अप्रस्तुत आहे. त्याचा उपयोग मद्य प्रासनासाठीच अधिक होईल. नाहीतरी दुर्ग अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक, संशोधक हे दिवसा उजेडातच आपले निरीक्षण करतात. रात्री हवं, तर मुक्काम सुद्धा करतात, पण त्यासाठी इतका खर्च करण्याची गरज नाही. कारण तळमणीचे अभ्यासक, असोत, जिज्ञासू असोत, की भाविक, त्यांना स्थळ भेटीत जास्त रस असतो. तिथल्या सुखसोयीत नाही.
बांधकामे करण्यात चपळाई...परंतू इतिहासेचे मुकसाक्षादार
असे इस्तत: विखुरलेले असतात...परंतू या अधिकार्‍यांना
जाब विचारणारे कोणी नाही...ज्यांनी नियंत्रण ठेवावे,
ते वरिष्ठ मुग गिळून गप्प बसतात...का? तर त्यांचे
हित टक्केवारीत जास्त असते!
आपल्या पूर्वजांनी दुर्गम ठिकाणी धार्मिक व ऐतिहासिक महत्वाच्या गोष्टी अफाट कष्ट करून उभ्या केल्या, त्यालोकांनी आपल्या पायावर त्याठिकाणी यावे याकरिता. त्यांच्या आरामासाठी नव्हे. लोकांनी आपल्या पायांचा वापर करावा. शुद्ध हवा घ्यावी. झर्‍यांचे स्वच्छ पाणी प्यावे. प्राणी-पक्षांचे निरीक्षण करावे, हा मुळ उद्देश. सिमेंटच्या पावर्‍यांमुळे खरे भाविक, खरे अभ्यासक दूर राहतील. वाईट प्रवृत्तीचाच जास्त शिरकाव होईल. मग गडांवरचे पाण्याचे साठी दुषित व्हायला वेळ लागणार नाही. याचा त्रास तिथल्या प्राणी जीवनाला तर होईलच, शिवाय निकोप आयुष्य जगणार्‍या स्थानिक रहिवाशांना सुद्धा होईल.