Saturday, June 11, 2016

औरंगजेब आणि मालोजीराजे भोसले...


दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला
घृष्णेश्वराकडे जाताना सतावल्यावाचून राहणार नाही...



हे आपल्याकडेच असं का होतं?

एका इतिहास पुरूषाला देवालयात स्थान मिळतं, तिनशे वर्षांनंतरही त्याच्या

स्मृतीस्थळाची नित्य देखभाल केली जाते, त्यावर दिवाबत्ती लावली जाते,

अनं दुसर्‍याच्या वाट्याला येते प्रचंड हेटाळणी...

मालोजीराजे भोसले आणि औरंगजेब...भारताच्या इतिहासातली अत्यंत

महत्वाची पाने यांच्या पराक्रमाने भरली आहेत...दोघांच्या भूमिका

हिन्दूस्थानच्या दृष्टीने तशा परस्परविरोधी...
मालोजी राजांनी अचाट बाहुबलाच्या जोरावर मैदानात मराठी पराक्रमाचा

झेंडा रोवला...हिंदवी स्वराजाचे स्वप्न रंगविणार्‍या शहाजी या पराक्रमी पुत्राला जन्म दिला, तर औरंगजेबने आपल्या अत्यंत धुर्तपणाने राजकारण करून अवघ्या भारतवर्षावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली...

त्यावेळची जगातली ही एक बलशाली राजवट होती...
मालोजीराजांचा जन्म १५५२ सालचा...विजापूर सुल्तानाविरुद्धच्या युद्धात इंदापूर येथे ते कामी आले...साल अंदाजे १६२० असावे...औरंगजेबचा जन्म १६१८ दाहेड येथे...मृत्यू १७०७ अहमदनगर येथे...वेरूळ  व खुल्ताबाद अशा एका शेजारी एक असलेल्या ठिकाणी हे दोघे चिरविश्रांती घेत आहेत, परंतू या दोघांच्या स्मृतीस्थळांना परस्परविरोधी भाग्य लाभल्याचे दिसून येते!

या सुट्टीत देवगिरीच्या यादवांनी बांधलेला जगप्रसिद्ध देवगिरीचा किल्ला

सहकुटुंब बघण्याचा आमचा निर्धार होता...हो! नाही करता करता आम्हाला

मुहूर्त गवसला ता ७ जुनचा...सात जुन म्हणजे पावसाच्या आगमनाची

वैजापूरच्या शेतात बागडणारे काळविट...या परिसरात दहा 

हजारच्या आसपाद काळविट असून शेतकरी त्यांची उपस्थिती भाग्याची मानतात...
पारंपारिक तारीख...गेल्या अनेक वर्षांपासून ही तारीख चूकतेय खरी, पण

आज सकाळ पासूनच आभाळ दाटलेले होते...उकाडाही प्रचंड होता...
अगोदर वेरूळला घृष्णेश्वराचे दर्शन घ्यायचे व मग पुढे देवगिरीला कुच

करायची, असा आमचा बेत...
वाटेत वैजपुरला एका शेताच्या बांधावर आम्ही कडूनिंबाच्या झाडाखाली

न्याहारीचा बेत हाणला, त्यावेळी दोन काळविटांचे मनोहारी दर्शन

घडले...मोहिमेची सुरूवात तर छान झाली होती...
वेरूळ गावच्या वेशीवर  घृष्णेश्वर व भद्रा मारूतीकडे निर्देश करणारे फलक

दिसले. पुढे एका फलकाने लक्ष्य  वेधून घेतले, 'आलमगिर औरंगजेबकी

मजार'. तेव्हाच ठरवलं, भारताच्या एका बलशाली बादशाहच्या स्मृतीस्थळाला

भेट द्यायची...पण अगोदर घृष्णेश्वर..
हल्ली एखाद्या बड्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची म्हटलं की अंगावर

काटा येतो...एक तर देवळात जाण्याकरिता भाविकांवर नाना बंधने...असंख्य

वळणा वळणाच्या लांबच लांब रांगा...त्यात पिशवी आत नेऊ नका...फोन

नेऊ नका...आवारात थांबू नका...त्याउपरही देवालयात प्रवेश मिळवलात तर

नीट दर्शन घेण्याची सुविधा नाही...ना दोन क्षण तल्लीन होऊन देवाची

आराधना करण्याची परवानगी...
आमच्याकडे सप्तश्रृंगीकड, शिर्डी, काळाराम मंदिर, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर

मंदिरात जाऊन दर्शन घेणे केवढे अडचणीचे बनले आहे, याचा अनूभव

आम्ही घेतच असतो...तसाच अनूभव पंढरपूर, तुळजापूर, जेजूरी या

ठिकाणीही घेतला आहे, त्यामुळे  घृष्णेश्वरात आख्खा कुटुंबकबिला नेण्याच्या

विचार अंमळ अडचणीचा होता...
परंतू धार्मिक व ऐतिहासिक अंगाने अत्यंत महत्वाच्या घृष्णेश्वराचे दर्शन

घ्यायचे होतेच...आज घृष्णेश्वराला अजिबात गर्दी नव्हती...विशेष म्हणजे थेट

मंदिराच्या जवळ गाडी नेण्याची परवानगी, तेव्हा झटपट दर्शन घेऊन पुढच्या

प्रवासाला निघायला मिळणार! ही भावना सुखावणारी होती...
घृष्णेश्वर मंदिराच्या बाहेर एका पुरातन मंदिराने लक्ष्य वेधून

घेतले...संपुर्णपणे दगडात घडवलेल्या या देवालयाचे कोरिवकाम व एकुण

स्थिती पाहता, ते फार पुरातन मंदिर असावे असे वाटत होते, परंतू या

मंदिराला लक्तरे निघालेल्या दुकांनांचा वेढा पडल्याचेही दिसून आले...लांबून

दोन फोटो घेऊन आम्ही  घृष्णेश्वराकडे निघालो...

या कथित देवालयाच्या चहुबाजूंनी लक्तरलेली दुकाने, 

मातीचे ढिगारे व कचर्‍याचा ढिग दृष्टीस पडतो...
मोबाईल...कॅमेरे फेकून द्या...
पहिल्या चिंचोळ्या द्वारात पोलिस ओरडत होता, मोबाईल व कॅमेरे आत

नेऊ नका...आमच्यातील पाच जणांकडे मोबाईल होते...माझा कॅमेरा व गाडी

चालकाचे दोन मोबाईल, यांचे करायचे काय? हा प्रश्न येण्यापूर्वीच समोरचा

दुकानदार खुणेने बोलावत असल्याचे जाणवले...फार गर्दी नसल्याने आम्ही

सर्वजण त्या दुकानात गेलो...तिथे मोबाईल व कॅमेरे सांभाळण्याची व्यवस्था

होती...प्रती डाग ५/- रूपये या दराने ४०/- रूपये मोजले व आम्ही

घ्रुष्णेश्वराच्या देवालयात मार्गस्थ झालो...फार पायपीट न घडवता आम्हाला

पटकन गाभार्‍यात जाता आले...
पुरूषांना गर्भगृहात टॉपलेस जावे लागते, तर महिलांना मात्र थेट गाभार्‍यात

प्रवेश दिला जातो...
लाल फत्तरात कोरलेल्या दगडात मंदिराचे बांधकाम लक्ष्यवेधी

आहे...खासकरून मंदिराचा कळस व आतील स्तंभ...काही जणांच्या ब्लॉगवर

मी ही छायाचित्रे बघितली आहेत...त्या भाग्यशाली लोकांना देवळाची

छायाचित्रे घेता आली...मला मात्र कॅमेरा नेण्याची संधी मिळू शकली

नाही...अर्थात मी तसा प्रयत्नही केला नाही...हल्ली कॅमेरे नेऊ नका...फोटो

काढू नका! भाविकांवर व पर्यटकांवर असे निर्बंध लादण्याची प्रथा रूढ झाली

आहे...याचा मला प्रचंड तिटकारा आहे...

शिवस्पर्षाचा गंध...
याच मंदिराच्या प्रांगणात माझ्या राजाने खुल्या असमंताखाली राजपुत्र

संभाजींसह मुक्काम केला होता...'पिता पूत्र कोठे थांबले असतील'...'त्यांनी

काय काय बघितले असेल', कशा अशा ना ना विचारांनी अंगावर रोम उभे

राहिले...
पुरंदरच्या तहात सर्वस्व गमावल्यानंतर संभाजींना पंधरा हजाराची मनसब

मोगल दरबारी मिळाली...शिवाजी राजांसाठीं शाही फर्मान निघाले...
''इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे. खातरजमेने यावे. म्हणजे भेटी अंती बहुत 

सत्कार पावुन माघारी जाण्याविषयी निरोप दिला जाईल''...

राजे मग उरल्या सुरल्या स्वराजाची उत्तम घडी बसवून निघाले आग्र्याला

बादशाहच्या भेटीला...औरंगाबाद मार्गे...
औरंगजेबने राजांसाठी खास पोषाख पाठवला होता...
''खुद शहजादा प्रमाणे अदब चालवावी, म्हणजे शिवाजी राजांच्या काफिल्याची 

उत्तम बडदास्त ठेवणे'' असे कडक फर्मान औरंगजेबने आपल्या तमाम

कुलफौजदार व महाल मोकासे यांना ताकिदपत्र देऊन पाठविले होते...
औरंगाबादचा सुभेदार सफशिकनखान मोठा घमंडी होता, त्याने शिवाजी

राजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, परंतू राजांनी त्याची शेखी जिरवली

तेव्हा, बादशाहची गैरमर्जी होईल या भितीने खान सुतासारखा सरळ झाला...
औरंगाबादेत काही काळ मुक्काम केल्यानंतर राजे पुढच्या प्रवासाला देवगिरी,

वेरूळ मार्गे निघाले...
भोसले हे मुळचे वेरूळचे...घृष्णेश्वर त्यांचे कुलदैवत...तेव्हा राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली...बालसंभाजीसह राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. राजांनी नजिकच्या कैलास लेण्यांचे दर्शन

घेतले...''कोण कलाकार असतील ते'', कैलास मंदिराची रचना बघून,

''साधूतत्वाशिवाय अशी अजोड रचना शक्य नाही'' असे राजांचे उद्‌गार

होते...तिथले मुर्तीकाम व मंदिराची रचना बघून राजे स्तिमित झाले...
राजे परत घृष्णेश्वर मंदिरात परतले....मंदिराच्या प्रांगणात राजांनी दोनवेळा

भोजनप्रसाद घेतला...राजांनी मंदिराच्या बाहेर खुल्या आसमंतात रात्र

काढली...आग्य्राला बादशाच्या भेटीला निघताना केवढं बळ घेतलं असेल

राजांनी घृष्णेश्वराकडून...कोण कोणत्या विचारांची वादळं डोक्यात थैमान

घालत असतील...की राजे अधिक शांत झाले असतील इथल्या वातावरणात!

अशा या इतिहास प्रसिद्ध घृष्णेश्वराच्या दर्शनाने आम्ही सर्वजण हर्षोल्हासित

झालो...
शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे यांनी घृष्णेश्वर देवालयाचा जिर्णोद्धार

केला...शिवांजी राजांचे पिताश्री शहाजींचा जन्म वेरूळ गावचा...
घृष्णेश्वराचे समाधानकारक दर्शन घेऊन आम्ही वाहनतळाकडे आमच्या

गाड्यांकडे निघालो, परंतू घृष्णेश्वराबाहेर ऐटीत उभ्या असलेल्या त्या प्राचीन

देवालयासमोर आमची पावले पुन्हा घुटमळली...
लक्तरलेली दुकाने ओलांडून आम्ही देवालयाकडे जाण्यास निघालो, तेव्हा

मंदिराच्या चहुबाजूला आम्हाला कचर्‍याचे साम्राज्य दिसले...मंदिराच्या

पहिल्या पायरीवरच कोणीतरी चक्क प्रातर्विधी उरकली होती...इतके सुंदर

देवालय इतक्या घाणीत कसे? याची कोणी देखभाल का करत नाही?
आम्ही आत प्रवेश केला, पण आत देवाच्या मुर्ती ऐवजी एक समाधी दृष्टीस

पडली...आत प्रचंड कुबट वास येत होता...वटवाघळांच्या वस्तीमुळे त्यांच्या

मलमुत्रांने उग्रदर्प सर्वत्र सुटला होता...फार थांबण्याची आवश्यकता उरली

नव्हती...आम्ही तडक समाधीस्थळ सोडले व वाहनतळ गाठले...तिथल्या

दुकानदाराला विचारले, ही वास्तू कसली? मालोजी राजे भोसल्यांची समाधी

आहे! विजेचा एकच झटका बसला...भोसले घराण्याचे पराक्रमी

वंशज...घृष्णेश्वराचे सुंदर देवालय बांधणार्‍या मालोजी राजांच्या समाधीची

अवकळा बघवत नाही...
आज उभा महाराष्ट्र शिवाजी व शहाजींचे गोडवे गातो, पण शहाजींच्या

पराक्रमी पित्यांच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्गती व्हावी? बोचणारे अनेक

प्रश्न घेऊन आम्ही भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी प्रयाण केले...

भद्रा मारूती म्हणजे जमिनीवर झोपलेली हनूमानाची मुर्ती, अन्यथा हनुमान

हे उभ्या स्थितीतच दिसतात...निद्रास्थितीतले हनूमान तिन ठिकाणी बघायला

मिळतात, एक म्हणजे अलाहबादेत यमुना नदीच्या तिरावर व दुसरे जाम

सावली, मध्यप्रदेशात...
खुल्ताबादचे नाव पूर्वी भद्रावती होते...तिथला पराक्रमी राजा भद्रसेनवरून हे

नाव पडले असावे...हे रामाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे तिथे नित्य

नियमाने रामस्तूती गायली जायची...एकदा खुद्द हनूमान ही रामस्तूती

ऐकण्यासाठी भद्रावतीला आले...राम भजनात तल्लीन होऊन हनूमानाला झोप

लागली व ते तिथेच भाव समाधीत ते आडवे पडले...भद्रासेनाची रामस्तूती

संपल्यानंतर खुद्द हनूमानाला बघून ते चकित झाले व त्यांनी हनूमालाला

तिथे निवास करण्याची विनंती केली...तेव्हा पासून हनूमानाची भाव

समाधीतली मुर्ती विराजमान आहे...
औरंगजेबच्या समाधीस्थळाचे प्रवेशद्वार स्वच्छ रखरखाव असलेले...
याठिकाणी प्रचंड असा सिमेंट कॉंक्रिटचा सभामंडप तयार करण्यात आला

आहे...आतमध्ये सुद्धा फोन नेऊ नका...पिशवी नेऊ नका...कॅमेरा नेऊ

नका...पुन्हा या गोष्टी बाहेरच्या दुकानात जमा करण्याची कसरत...

पर्यटन मंत्र्यांनीच आता या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे...लोकांनी धार्मिक

पर्यटनाला जाताना सोबत मोबाईल फोन व कॅमेरे न्यायचे की नाही...जो तो

उठतो आणि या गोष्टींवर बंधने आणतो...बाहेर गावी या गोष्टी  एकतर

गाडीत ठेवणे सुरक्षित नाही...व एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे सोपविणे मोठे

जोखमीचे...दहशतवादाचा धोका जगात सर्वत्र असला तरी जगातील प्रमूख

पर्यटन स्थळी फोटो काढू दिले जातात ते कसे? ताजमहाल सारखी संरक्षित

वास्तू नाही...खजूराहो सारखे संरक्षित ठिकाण नाही...त्याठिकाणी सुद्धा फोटो

काढण्याची...फोन आत नेण्याची परवानगी आहेच ना...असो...
भद्रा मारूतीचे झटपट दर्शन आटोपले व आम्ही
खुलताबादेच्या वेशीच्या बाहेर पोहोचलो...एका भव्य मशिदीवर, मजार मोगल

सम्राट शहंशाह हजरत औरंगजेब (रह) हा फलक दिसला...हा रह म्हणजे

रेहमतुल्लाह या अर्थाने लिहीला असावा...याचा अर्थ ईश्वराची करूणा...
भारतावर निरंकुश सत्ता स्थापन करणार्‍या औरंगजेबचे स्मृतीस्थळ आहे तरी

कसे? आमची पावले या जुन्या वास्तूत वळली...पुर्णपणे काळ्या पाषाणात

हिन्दूस्तानच्या महापराक्रमी बादशाहची साधीशी कबर...
असंख्य कमानी व स्तंभात ही मशिद घडविली आहे...त्याला चुन्याची

रंगसभेदी व कडा हिरव्या व सोनेरी रंगात रंगविल्या आहेत...
आत गेल्यावर आम्हाला प्रथम हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी (रह) यांच्या

समाधीकडे नेण्यात आले...हे मुस्लीम धर्मातले २२वे व शेवटचे

खलिफा...औरंगजेब यांना आपला गुरू मानित...
हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांना दस्तूरखुद्द महंमद पैगंबर यांनी आपला

पोषाख दिला होता...हा पोषाख त्यांना अल्ला कडून मिळाला, तोच याठिकाणी

सुरक्षित ठेला आहे...रमजानच्या महिन्यात आठ दहा लाख भाविक या

पोषाखाचे दर्शन घ्यायला येतात, अशी माहिती आम्हीला मिळाली...
ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांच्या कबरीच्या बाहेर उजव्या बाजुला औरंगजेबचा

पुत्र आझमशाह व त्याच्या पत्नीच्या कबरी आहेत...कोणतेही छत नसलेल्या

या कबरी खुल्या आसमंताखाली आहे व त्यांना फक्त संगमरमरी दगडात

कोरलेल्या जाळ्या आहेत...
डाव्या बाजुला औरंगजेबची तशाच स्वरूपात समाधी आहे...परंतू तिचे

प्रवेशद्वार बाहेरून आहे...संभाजी राजांची हत्या केल्यानंतर पंचवीस वर्ष

औरंगजेब दख्खनमध्ये राहिला, परंतू दख्खन काही त्याला हाती लागला

नाही, अखेर नगरमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला...आपला देहांत

झाल्यावर आपले दफन गुरूचरणी व्हावे, वर कोणतेही छप्पर नसावे...टोप्या

शिवून कमावलेल्या रकमेतील फक्त १४ किंवा १२ आणे आपल्या कबरीवर

खर्च करावे अशी औरंगजेबची इच्छा होती...त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीची

ही कबर बांधली आहे...दहा बाय दहाची जागा असावी...तथापी चहुबाजूंना

संगमरमरी जाळीदार खिडक्या व प्रवेश द्वार संगमरमरात घडविले आहे...
कबरीचा जमिनीशी थेट संबंध असावा...असे औरंगजेबचे इच्छापत्र

होते...त्यावर सुगंध दरवळत रहावा याकरिता सब्जाचे एक रोप लावल्याचे

दिसून येते...संपूर्ण कबर ही संगमरममरात घडविली असून त्यावर पांढरी

चादर टाकण्यात येते व त्यावर गुलाबाची फुले टाकली जातात...औरंगजेबने

इच्छी व्यक्ती केली होती, त्याचे पालन आजही केल्याचे दिसून येते...
औरंगजेबच्या कबरीची आजही देखभाल ठेवली जाते...त्यावर सफेद चादर
टाकून रोज गुलाबाची फुले चढविली जातात...
ज्या भूमीवर त्याने अनन्वीत अत्याचार केले त्या औरंगजेबच्या वाट्याला

त्याच दख्खनेत तीनशे वर्षांनंतरही त्याच्या इच्छेनुसार सन्मान मिळाला...
वेरूळ व खुलल्ताबादेत दोन इतिहासपुरूषांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही

देवगिरीच्या किल्ल्याकडे कुच केली...देवगिरीचा वृत्तांत पुढील लेखात...

1 comment: