Tuesday, March 31, 2009

... अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागेल

भेदरलेले विद्यार्थी : ... अन्‌ स्थानिक यंत्रणेचा "क्विक रिस्पॉन्स'?

प्रशांत परदेशी ः
नाशिक, ता. 20 : मुंबईतील "26/11'सारखी एखादी दहशतीची घटना नाशिकमध्ये घडली, तर संरक्षण यंत्रणा कितव्या मिनिटाला प्रतिसाद देतील, हे माहीत नाही. परंतु, मधुमक्षिकासारखा एखादा जैविक हल्ला झाला तर? एक तास, दोन तास, तीन तास...? पंचवटीतल्या एका शाळेचा अनुभव विचाराल, तर याचे उत्तर आठ तास किंवा कदाचित प्रतिसादच नाही! असे देता येऊ शकेल.
आज सकाळी पंचवटीतील आर. पी. विद्यालयाच्या प्रांगणातील बाबूभाई कापडिया प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे शाळेची लगबग सुरू होती. प्राथमिकचे वर्ग सकाळी आठला सुरू होतात, त्यामुळे विद्यार्थी व त्यांना सोडण्यासाठी येणारे पालक अशी वर्दळ साडेसातपासून सुरू होती. पावणेआठ- आठपर्यंत पाचशेच्या आसपास विद्यार्थी व सुमारे पंचवीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबून होते. शाळेत कुणालाही जाऊ दिले जात नव्हते. दाराजवळच विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ढीग जमा झाले होते. मधमाश्‍यांचे मोहोळ उठल्याची चर्चा एव्हाना सर्वत्र पसरली होती. काही पालकांनी आणीबाणीच्या प्रसंगी आठवणारा 100 क्रमांक फिरवून पाहिला; परंतु अग्निशामक दलाकडून "मधमाश्‍यांचे नियंत्रण आमच्याकडे नाही,' असे सांगण्यात आले.
तोपर्यंत प्रवेशद्वारासमोरच्या झाडाखाली बसलेल्या मुलांवर मधमाश्‍या चाल करू लागल्या. चार- पाच मुलांना त्यांनी चावे घेतल्याने मुलांमध्ये एकच हल्लाकल्लोळ माजला. विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या शिक्षकांवर मधमाश्‍यांचा हल्ला बिनदिक्कत सुरू होता. एखाद- दुसरी माशी असती तर एका क्षणात तिच्यावर नियंत्रण मिळविता आले असते. परंतु, त्यांच्या समूहाची माहिती मिळाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. काही पालकांनी एखाद्या पत्रकाराच्या मदतीने सरकारी यंत्रणेची मदत मिळविता येते का, याचा तपास सुरू केला. दोन पत्रकारांना दूरध्वनी करून तातडीने सरकारी यंत्रणेकडून मदत मिळविण्याची याचना करण्यात आली. या पत्रकारांनी लागलीच माहिती घेऊन पेस्ट कंट्रोल विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले. परंतु, एवढ्या सकाळी दूरध्वनी खणखणतच राहतील, प्रतिसाद मिळणार नाही, हे ठाऊक होते. कोणीतरी सर्प पकडणाऱ्या सर्पमित्र वा बिबट्यावर नियंत्रण मिळविणाऱ्या वनाधिकाऱ्यांचा क्रमांक फिरवून त्यांना घटनेची कल्पना दिली. परंतु, याठिकाणीही निराशाच! मधमाश्‍या वन्यजीव असल्या, तरी त्या आमच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत व आमच्याकडे तशी यंत्रणा नाही, अशा उत्तरासह संभाषणही तिथेच संपले.
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने पेस्ट कंट्रोल विभागाला माहिती कळविल्याचे सांगितले. त्यामुळे पालक व शिक्षकांच्या जीवात जीव आला. परंतु, एक तास उलटला, दोन तास उलटले, तीन तास उलटले, तरी पेस्ट कंट्रोलकडून कुणीही येईना. तोपर्यंत सर्वच्या सर्व पाचशे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानातील एका झाडाखाली बसविण्यात आले. मुलांनी या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांच्या खुल्या वातावरणातील शिक्षणाचा वह्या-पुस्तकांविनाच आनंद लुटला.
मुलांना शाळेत सोडल्यानंतर पालक निर्धास्त मनाने घरी परततात, त्यामुळे वर्गाविना या मुलांना दिवसभर सांभाळण्याची जबाबदारी, नव्हे विवंचना शिक्षकवृंदास भेडसावू लागली. डोक्‍यावर तो भास्कर मिनिटागणिक आग ओकतच होता. तोपर्यंत पाच ते सात विद्यार्थ्यांना व तीन शिक्षकांना मधमाश्‍यांनी दंश केला होता.
""शाळेत मोकळी जागा भरपूर असल्याने विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आता शनिवार व रविवारच्या सुटीच्या दिवशी या मधमाश्‍या नेमक्‍या कुठून उठल्या, याचा तपास करून पेठ नाक्‍यावरील कोकणी मजुरांच्या मदतीने पोळी काढली जातील'', अशी माहिती मुख्याद्यापिका नंदा गाला यांनी दिली.

Monday, January 19, 2009

Vasota fortress :




In the midst of thick forest of the Koyna tiger reserve, fort Vasota is a treat to visit…
capital of Matatha kingdom
January has been really breath taking, after Dhodap fort, we successfully trek the Vasota fortress, capital of Matatha kingdom after chatrapati Shivaji Maharaj. I think, no trekker is complete unless and until he visit Vasota. The hill of lord Nageshwar is a bonus. The descent is so steep that with all the loaded sack it can really tire you. The humidity of Konkan really added to our woes.

Yeola Kite : at Durpan Stores



Kite local speciality…
This Year I could enjoy kite flying after a gap of some four to five years. This time around Nashik witness record number of kites. The city sky was filled with numerous kites. I and my dear wife created biggest kite of Nashik, in our local Yeola style. It was really hugh, and we prepared three lagre one's.

Friday, December 12, 2008

Mission Dhodap fort : my system recharged



Almost 10,000 feet’s climb and descent within 24 hours, really set my body system to normal. I was worn-out, and in a dejected frame of mind, after the Mumbai terror incident. Also my office work was monotonous, to add to my dismay.
On Saturday 6th, I and my adventurous videographer friend, Maulie (Dynashwer) visited Dhodap Fort. It is located near Hatti village, near Dhodambe village of Chandwad Tehsil. The way leads from leftwards of Vadalibhoie, from Nashik towards Chandwad, on Mumbai-Agra National Highway. We missed the virgin climb of Dhodap Pinnacle from its most difficult west side. Samiran Konhe anchored the breathtaking mission, and Somdutta Mhaskar excelled equally well to Jumar the way.

Tuesday, December 2, 2008

Students of Kalwan experience Bullets and Grenades


Picture of the Taj Heritage hotle taken from the sea.

कळवणच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला थरार
प्राण कंठाशी : समुद्रातील ते अस्वस्थ आठ तास

प्रशांत परदेशी,
नाशिक, ता. 1 : 26 नोव्हेंबरला अतिरेक्‍यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचे "लाइव्ह कव्हरेज' बघण्यात अनेकांनी रात्र घालवली. कळवण व आसपासच्या गावांतील अनेक घरांनी आख्खी रात्र दूरचित्रवाणी संचासमोर घालवली; परंतु त्यातील अनेकांच्या नजरा दूरचित्रवाणीवर व प्राण समुद्राकडे लागले होते. सहलीनिमित्त गेलेल्या आपल्या चिमुकल्यांचे काय झाले असेल? या चिंतेत ग्रामस्थांचा प्रत्येक क्षण कमालीच्या तणावाखाली गेला. तब्बल 21 तासांची पालक व आप्तस्वकीयांची घालमेल सहलीची बस कळवणला परतल्यावर शमली; परंतु त्या 21 तासांची अस्वस्थता पालकांच्या काळजाचा थरकाप उडवीत आहे.

कळवणच्या एका शाळेच्या 87 विद्यार्थ्यांची सहल सोमवारी (ता. 24) मुंबईला निघाली. त्यावेळी "गावाकडच्या मुलांना मुंबई दर्शन घडणार' याचे समाधान पालक व आप्तस्वकीयांच्या चेहऱ्यावर जणू झळकत होते. बरोबर सहा शिक्षक होते. कळवा येथे निवासाची सोय करण्यात आली होती. मंगळवारी (ता. 25) दिवसभर "एस्सेल वर्ल्ड'चा आनंद लुटल्यानंतर सहलीचा मुक्‍काम पुन्हा कळव्याला.
दुसऱ्या दिवशी मुंबई दर्शन करायचे, रात्री गेट वे ऑफ इंडियासमोर बोटीत भोजनाचा आस्वाद घ्यायचा, असा सहलीचा कार्यक्रम होता.
दिवसभर मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे बघितल्यानंतर बुधवारी (ता. 26) रात्री आठला हॉटेल ताजजवळील पार्किंगवर बस थांबवून विद्यार्थी व शिक्षकांचा लवाजमा गेट वे ऑफ इंडियावर पोचला. बोटीवर डेरेदाखल झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लाटांवर हेलकावणाऱ्या बोटीत गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सुमारे तासभर मनमुराद नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर बोटीवरच जेवण देण्यात आले होते; मात्र पावणे दहाच्या सुमाराला कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने साऱ्यांचे लक्ष वेधले. बोट चालकाने बॉंबस्फोट झाल्याची खबर दिली आणि बोटीवरच्या शिक्षकांत भीतीची लाट पसरली. "आता पुढे काय' या विवंचनेत बोट गेट वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावर नेण्यात आली तेव्हा हॉटेल ताजमधून गोळीबार व हातबॉंबचे सत्र सुरू होते. अशा स्थितीत आपली बस पार्किंगमधून बाहेर काढणे अशक्‍य होते. इतक्‍या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना बाहेर आणण्याचा धोका ओळखून शिक्षकांनी तत्काळ बोट मागे फिरवून समुद्रात तीन ते चार किलो मीटर दूर नेली.
त्यानंतर सुरू झाले ते अत्यंत भेदरवणारे सत्र. गोळी बार व हातबॉंबचे आवाज काळीज हेलावून टाक होते. बोटीवरचे संगीत व सर्व दिवे बंद करून विद्यार्थ्यांना गुपचूप बसण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षकांनी बोटीचा वरचा मजला पूर्ण रिकामा करून विद्यार्थ्यांना आडवे होण्याचे निर्देश दिले, त्यानंतर सर्वांनी याचि देही याचि डोळा "ताज'मधून होणारा गोळीबार व हातबॉंबचा वर्षाव बघितला.
"बोटीत विद्यार्थी असल्याचे अतिरेक्‍यांना समजले असते, तर कोण अनर्थ ओढवला असता' या जाणिवेने शिक्षकांची गाळण उडाली होती. कोणीही जागचे हालत नव्हते. कोणाला तहान लागत नव्हती, की मच्छरांचे गुणगुणणे जाणवत नव्हते. सुरवातीला त्रासदायक वाटणारा दमट हवेचा त्रास केव्हाच पळाला होता. साऱ्यांना एकच चिंता सतावत होती, ती आपली बस सुखरूप असेल ना, याची.
"बोटीत कोणी नाहीच आहे', इतक्‍या निपचीतपणे विद्यार्थ्यांनी रात्र काढली. डोळ्यासमोर दहशतवादाचा भयानक चेहरा नाचत होता. त्यामुळे अनेकांना झोपसुद्धा लागली नाही.
सकाळी सहाच्या सुमाराला बसचालकाने मोठ्या शिताफीने पार्किंगमधून बस काढून कुलाब्याकडे किनाऱ्यावर आणली. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बोट कुलाबा किनाऱ्यावर आणून कळवणचे विद्यार्थी व शिक्षक बसमध्ये बसले आणि सप्तशृंगीचे नामस्मरण करून बस थेट नाशिकच्या दिशेने दामटविण्यात आली.
इकडे कळवण व परिसरातील पालक व आप्तस्वकीयांचे प्राण जणू कंठाशी आले होते. मोबाईलवरून अनेकांनी शिक्षकांशी संपर्क साधला तेव्हा सर्व जण सुखरूप असल्याचा निरोप मिळाला होता; परंतु अतिरेक्‍यांनी संपूर्ण मुंबईत दहशत माजविल्याचे चित्र दूरचित्रवाणीवरून बघितल्याने गावात कुणालाही चैन पडत नव्हती.
गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला बस कळवणमध्ये दाखल झाली, तेव्हाच पाणावलेल्या नजरा शांत झाल्या. जो तो आपल्या जिवाच्या तुकड्याला शोधून बिलगत होता व रडत होता. "सकाळ'ने काही मुलांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी गोळीबार व हातबॉंबचा थरार कथन केला. भरसमुद्रात अंधारात अजिबात न हालता रात्र काढताना कमालीचा त्रास झाला; परंतु शिक्षकांनी न हालता चुपचाप राहण्याचे निर्देश दिल्याने आम्ही सुखरूप राहिल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

तणाव चाचण्या

मुंबईत सहलीला गेलेले कळवणचे विद्यार्थी सहीसलामत घरी परतले, परंतू आता आपल्या पाल्याच्या चिंतेत सुमारे चोविस तास घालविणाऱ्या कळवण व परिसरातील पालकांना अस्वस्थपणा जाणवत असून मंगळवारी (ता. 2) काही पालकांनी नाशिक शहरात तणाव चाचणी करून घेतली. मुंबई दहशतवाद्यांच्या घेऱ्यात होती त्यावेळी ताज हॉटेल पासून अवघ्या काही मीटरवरून विद्यार्थी गोळीबार व बॉम्बस्फोट घडताना बघत होते, तर इकडे कळवण व आजपासच्या खेड्यातील पालकांच्या जीवाची क्षणाक्षणाला घालमेल होत होती.
दुरचित्रवाणीवरचा बातम्या "माहिती' म्हणून ठिक असला तरी त्याचा इतका प्रचंड मारा सुरू आहे की आता त्याचा त्रास होऊ लागला आहे. कळवणमध्ये काही पालकांची तब्येत खालावल्याने त्यांना नाशिकमध्ये तपासणीकरिता दाखल करण्यात आले. एका खासगी रूग्णालयात नातलगांची मोठी गर्दी झाली होती. दुरचित्रवाणीवरच्या बातम्या व तेच तेच चित्र, बातम्यांसोबत वाजणारे संगीत अस्वस्थ करणारे आहे, "ते' त्रासात भर घालत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. "नको त्या बातम्या, नको त्या मुलाखती', आम्हाला माफ करा अशा शब्दात या पालकांनी मुलाखत देण्यास नकार दिला. डिसेंबर महिन्यात कळवणला मोठी जत्रा भरते, परंतू यंदा जत्रेच्या तयारीत मन लागत नसल्याचे एका पालकाने बोलताना सांगितले.