Wednesday, April 7, 2010

कुठे गेली नाशिकची थंड हवा?




- हा प्रश्‍न बऱ्याच वर्षांपूर्वी मागे पडला आहे. वृक्षवल्लीची अपरिमीत कत्तल, वाहनांची वाढती संख्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पडलेला विसर, यामुळे महाराष्ट्रातील इतर तप्त शहरांप्रमाणे नाशिपकची उन्हाळ्यात भट्टी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. प्रत्येक जण अंगाची तगमग कमी करण्यासाठी शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेत मिळणारे धडे प्रत्यक्षात अंमलात आणणारे हे बालक लासलगावच्या आठवडे बाजारात आपल्या आईसोबत भाजीपाला विक्रीसाठी आले ते मस्तकावर वर्तमानपत्राची टोपी चढवून. नाशिकही उन्हाळ्यात रापतं हे दाखवन देणारे हे चित्र.

No comments:

Post a Comment