Wednesday, September 18, 2019

साल्हेर साल्हेर राहो


साल्हेरशी खरोखरच असे खेळले जाऊ नये. महाराष्ट्रातला हा सर्वात उंच किल्ला आहे. तिथला इतिहास अजोड आहे. तिथली जैवविविधता बेजोड आहे. विकासाचे भलतेच वारे त्याचा लौकिक धुलिस मिळवू शकते. येणार्‍या पिढ्यांसाठी याचा इतिहास आणि भूगोल शिल्लक तर ठेवाल! याचे भान नाही ठेवले तर महाराष्ट्राच्या इतिहासात हा मोठा आत्मघात ठरेल.
साल्हेर साल्हेर राहो
साल्हेरची जैवविविधता थक्क करणारी आहे. खरे तर सारा सह्यद्री जगातले जैवविविधतेचे अनोखे ठिकाण आहे. तिथल्या जैवविविधतेला मानवी विकासाची बाधा झाल्यामुळे ती कमालीची धोक्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दहा वर्षांपूर्वीच त्यास जैवविविधतेस सर्वाधिक धोका पोहोचलेल्या जगातील ६४ स्थळांपैकी ७वे सर्वात बाधित स्थळ म्हणून घोषित केले आहे. जगभरातील अभ्यासकांच्या ठायी सह्याद्रीतून अनेक जिव हद्दपार होत आहेत. वाघ, हत्ती सारखे मोठे जीव आता केवळ नावा पूरतेच उरले आहेत. सिंह, चिते नामशेष झाले आहेत. लहान जीवांची तर गणनाच नाही. असे असताना नुकतेच महाराष्ट्रातल्या शंभरएक किल्ल्यावर पर्यटनस्थळ उभारण्याचा मनोदय महाराष्ट्र सरकारने व्यक्त केले आहे. तिथे हॉटेल थाटणार. लग्न सोहळे रंगणार या बातम्या मन सुन्न करणार्‍या आहेत.


सद्या साल्हेरवर पावसाळी फुलांचा मेळा भरला आहे. संपुर्ण साल्हेर हा जांभळ्या गुलाबी, तेरड्याने सजला आहे. अक्षरश: लाखोंच्या संख्येने तेरडा फुलला आहे.  वरच्या टप्प्यात पिवळी फुले आहेत. गडमाथ्याच्या भोवती फिकट निळी रानफुले आहेत. तर रेणूका मातेच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुलाबी, पांढरी फुले फुलली आहेत.
कोणे एके काळी साल्हेरला घनदाट जंगल होते. ते आता पुर्णपणे नामशेष झाले आहे. याची सुरूवात केली ती इंग्रजांनी. तिवस हे जगाच्या पाठीवर साल्हेर परिसरातच आढळायचे. अतिशय टणक लाकुड देणार्‍या या झाडाची इंग्रजांनी रेल्वेचे स्लिपर्स बनविण्यासाठी तुफान कत्तल केली. परिसरातल्या लाकुडतोड्यांनी त्याची इतकी कत्तल केली की, अनमोल असा तिवस आता शोधायचे म्हटले तर दिसत नाही. मानवी वरवंट्यात फक्त तिवस सापडला नाही, बागलाणच्या या गौरवशाली जंगलाची इतकी अफाट प्रमाणावर तोड झाली की, सह्याद्रीतले सगळ्यात उंच डोंगर असूनही आज हा परिसर पावसाला पारखा झाला आहे. मोजक्याच भागात चांगला पाऊस होतो. आता उरली सुरली जैव संपन्नता सरकारच्या अशा प्रयत्नांनी नष्ट होणार हे सांगायला कोण्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही.

साल्हेरचे दरवाजे शाबूत आहेत. जुन्या हिंदू राजांनी कातळात देखणे शिल्प कोरून हे दरवाजे बनवलेत. सुंदरशा गुहा खोदल्यात. गडाला देखण्या पायर्‍यांची गडाला वाट आहे. कित्येक तळी, टाकी आहेत. त्याचा इतिहास, त्यावरची पाने, फुल अशा पद्धतीनेसंवर्धन केले जाऊ शकतात की सार्‍या जगाला हेवा वाटावा. पुरातत्व विभागाने दोन वर्षांपूर्वीच शासनाला महाराष्ट्रातील १८ गडांची सूची संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पाठविली होती. प्राथमिक अधिसूचित साल्हेर, धोडप (नाशिक), पारगड, गगनगड, कलानंदीगड, पावनगड, सामानगड (कोल्हापूर) दातेगड, वर्धनगड, भूषणगड, वंदनगड (सातारा) यांचा समावेश प्रलंबित आहे तर, अंतिम अधिसूचनेसाठी हातगड (नाशिक), लळिंग (धुळे), खर्डा (अहमदनगर), निविती (सिंधुदुर्ग), कर्नाळा, खांदेरी (रायगड), मौजे साटवलीची गढी ( रत्नागिरी) प्रलंबित आहेत.
पावसाळ्याचे चार महिना साल्हेर त्याच्यावर पाय टिकू देत नाही इतका त्यावर पाऊस असतो. त्याच्या पुरातन पायवाटा कमालीच्या निसरड्या बनलेल्या असतात. महाराष्ट्र सरकारला त्यावर पर्यटनस्थळ उभारणे सर्वथैव गैरकायदा वगैरसोयीचे ठरेल.

साल्हेरवर रिसोर्ट, हॉटेल, विवाह कार्यालये थाटण्याचा विचार न केवळ मुर्खपणाचा तो मन सुन्न करणारा आहे. तिथे काहीच बदल करता येणार नाही. केवळ पुरातत्व खात्याच्या संरक्षित स्मारके सूचित नाही म्हणून त्यावरच्या  अनमोल पुरातत्वीय अवशेषांकडे दुर्लक्ष करून सरकारला त्यावर कोणतेच बांधकाम करता येणार नाही. उलट ही सूची त्यांनी तातडीने मंजूर करावी याकरिता दुर्गप्रेमी व दुर्गसंवर्धन संस्थांनी आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ नेऊन सरकारला विनंती करावी.

साल्हेरवर रिसोर्ट, हॉटेल, विवाह कार्यालये थाटण्याचा विचार न केवळ मुर्खपणाचा तो मन सुन्न करणारा आहे. तिथे काहीच बदल करता येणार नाही. हजार कोटी रूपये खर्च केले तरी जुने वैभव वागवणारे बांधकाम पुन्हा निर्माण करता येणार नाही. मग त्यात गडाच्या सौंदर्याला, तिथल्या इतिहासाला बाधा आणील असे आजच्या पद्धतीचे काम करून कसे चालेल.
गडाची दगडीवाट नविन बांधकाम न करता दुरूस्त करावी. पायवाट ही दगड गोटे काढून थोडी स्वच्छ करावी. गडावरच्या गुहा, मंदिरे लेणी हे झाडलोट करून स्वच्छ करण्याची व्यस्था बसवावी. गडावर आजवर बसवलेले मार्गदर्शन फलक, दिशादर्शक बाण आदी काहीच टिकू शकले नाहीत इतके तिथले प्रतिकुल हवामान आहे. तेव्हा सरकार जो काही खर्च करणार तो वायाच जाणार आहे. शिवाय तिथे उंची राहणीमान असलेली मंडळी मोठ्या संख्येने येत नाही. येथे बहुतांशी लोक अंगापिंडाने मजबूत व मनाने सह्याद्रीमय असल्यामुळे ते सगळा कुटुंब कबिला घेऊन गड पायी चढतात व उतरतात. त्यांना ना दोरवाटेची गरज आहे ना पदपाथाची ना बांधिव पायर्‍यांची. राहण्यासाठी हॉटेलची आवश्यक्ता नाही, त्या ऐवजी गुहा, मदिरे स्वच्छ वा दूरूस्त करावीत.
सटाण्यातील दुर्गवीर प्रतिष्ठानच्या प्रयत्नांनी सूर्याजी काकडेची नव्याने उजाडेत आलेली समाधी.
आधिनिक साहित्या त्यावर टिकत नाही म्हणून जुन्या पद्दतीने बांधकाम वा दुरूस्ती करावी. थोड्या खर्चात गड सावरावा. पायथ्याला वनखात्याने कित्येक छत्र्या उभ्या केल्या आहेत. त्याचा पर्यटक लाभ घेत नाहीत असे स्थानिकांचे म्हणने आहे. त्याही जिर्ण झाल्या आहेत. हा सगळा खर्च वायफळ ठरला आहे. आणखी काही कोटी ओतुन पैसा मातीमोल करण्यापेक्षा कित्येक पिढ्या इथला निसर्ग व इतिहास आठवणीत ठेवतील अशा प्रकारचा या गडाचा विकास व सुधारणा करावी.

स्थानिक लोकांतून गडाचा इतिहास व जैवविविधता याची माहिती देणारे गडमार्गदर्शक प्रशिक्षण देऊन तयार करावेत. स्थानिकांनाच जेवण नाष्ता आदी बनविण्याचे व ते स्वच्छ पणे सादर करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून द्यावा. मोठ्या हॉटेल चेनकडे किंवा केटररकडे गड देऊन काय उपयोगाचा. त्याने बाजारू पद्दतीच्या सोयी व सुविधा मिळतील. ज्या आज सर्वत्र मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. साल्हेरचा लाल तांदूळ हा सुद्धा याच परिसरात आढळतो. तो रासायनिक खते न वापरता पिकवण्यास प्रोत्साहन दिले तर जगाच्या पाठीवर त्याचा डंका वाजेल.
दुर्गवीरचे कार्यकर्ते समाधीस्थळाची स्वच्छता करताना.

साल्हेर संग्रामात शिवाजी महाराजांचा महत्वाचा सरदार सूर्याजी काकडे आहे पाच एक हजार मराठ्यांसह कामी आल्याचा गौरवशाली इतिहास आहे. सूर्याजीरावांची समाधी काळाच्या उदरात हरवली होती. आजवर तिसर्‍या दरवाजानंतर लागणार्‍या सपाटीवरची समाधी ही सूर्याजी काकडेंची समाधी म्हणून मानली जात होती. त्याबद्दल सबळ असे पूरावे नव्हते. सटाण्याच्या दुर्गवीर प्रतिष्ठानने बागुल राजांच्या वंशजांशी संपर्क साधला. तिथल्या एका बुजुर्गाने सूर्याजी काकडेची समाधी कोणत्याठिकाणी होती याची माहिती दिली. त्यावरून शोध घेण्यात आला. रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी या समाधीची दुर्गवीर्‍या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
अनेक राजवटींचा या गडाला इतिहास लाभला आहे. इतिहास, पराणातील अनेक थोर मंडळींनी या गडाला भेटी दिल्याचे दाखले दिले जातात. त्यावर अभ्यास करून गडाच्या पायथ्याल दृकश्राव्य सादरीकरणाची व्यवस्था करता येऊ शकते. साल्हेर साल्हेरच राहू द्या. तो काही फक्त सर्वात उंच किल्ला नाही, महाराष्ट्राच्या इतिहासाचा, भुगोलाचा व जैवविविधतेचा तो मानबिंदू आहे.
गडनिवासिनी कालिकादेवी मंदिर परिसरात जुन्या तटबंदीलगतचा तळे

मातीत दबल्या गेलेल्या विशाल तटबंदीचे अवशेष.


दगडा जवळ सुद्धा हट्टाने उगवलेला तेरडा सर्वत्रच

तेरड्याच्या ताटव्यामागे लपलेला टकारा

पावसाळ्याचा जोम तेरडा


गडावरची प्रत्येक वाट मोहक फुलाच्या ताटव्यातून

टकार्‍यालगतचा हा कडा सूदूर तरड्याने बहरलेला

साल्हेरवाडीकडचे कडे हिरवे जांभळे बहरलेले

पहिला बुरूज साल्हेरवाडीच्या बाजूने त्याला घेराव तेरड्याचा

थोडा वेळ पांढरे ढग बाजूला होऊन स्वच्छ किरणांना वाट करून देताना

प्रत्यक्षात पहिला दरवाजा कोणी तरी कुंचल्यातून आज सजवला होता

पलिकडची कथा...पहिल्या दरवाजाच्या मागे असा स्वर्ग फुलला 

महादरवाजाचे छोटे देखणे प्रवेशद्वार

दुसर्‍या दरवाजावरचा मराठी शिलालेख

त्या शौर्याला हिरवाईची मानवंदना

फक्त आणि फक्त तेरड्यातून उलगडलेली वाट जणू टकार्‍याकडे घेऊन जातेय

आखीव नाही रेखीव नाही...इथे सगळेच मोठे कलात्मक

पाना फुलांचे साज गाठे स्वर्गाची वाट

जुनी कातळ वाट

कठिणतेची कसोटी शेवटच्या कातळद्वाराच्या उभ्या पायर्‍या

काही क्षण ढगाचा तलम पडदा सरला साल्हेरवाडीचे घ्या रम्य दर्शन

शेवटच्या दरवाजाची हिरवी छटा खास पावसाळी स्वागतासाठी 
कोणा तरी वीराने नक्कीच या दगडावर विश्राम केला असेल



काय ते वैभव...टोपली कारवीतून उलगडली वाट

टोपली कारवीच्या वाटेचा थाट

जेव्हा ही कारवी फुलेल तेव्हा.. 
यांचे कार्यक्षेत्र ठरलेले शेवटच्या दरवाजापासून माथ्यापर्यंत



शूर वीर साधूचरित वा वन्यजीवांचे पाणवठे

साल्हेरच्या गुहांच्या भेटीत लाभतात ढग सतत 
गुहेत दोनच स्तंभ एक सुंदर कोरी दुसरा साधा रूंद



कवीराज भुषणाची वंदना


साल्हेर संग्रामाचे रसदार वर्णन
यांचं ठरलय...ही निळसर फुले फक्त शेवटच्या दरवाजानंतरच दिसतात
कार्वी आणि गवताच्या मध्ये शिरकाव करून यांनी आपली जागा शोधलीय...



दभूत..अमूर्त मातीटाके फक्त मुक्या जीवांसाठीच!

गंगासागर तलावाच्या वरच्या टप्प्यातल्या डाव्या गुहेच्या दालनातला एकमात्र कोरीव खांब

गंगासागरच्या वरची गुहा उजवीकडे मारूतीची मुर्ती मध्यभागी आणि डावीकडे अशी तीन दालने

निळी पिवळी जुगंलबंदी


गंगासागर तलाव...चार महिने तो असाच ढग नी धुक्यात वेढलेला...

केवढी ही शांतता...यात रेणूगामातेची जुनी कातळकोरिव मुर्ती तर शेजारी गणपतीची मुर्ती
जुने वैभव संपलेय...आता झाडे झुडपे यास सजवताहेत...



रेणूका मंदिराच्या प्राकारात असे सुंदर नक्षिदार खांब

ही प्रजाती थोडी खास...मंदिर परिसरातच यांची आरास...

साल्हेर 'सर' केल्यावर अशी फुले दर्शनाने घालवी सारे श्रम...

सह्याद्रीत आम्ही सर्वत्र...येथू रेणूकाईच्या सेवेसी...

सजिव चित्र: ही रंगसंगती...काळ्या पाषाणावर...

यज्ञवेदी...पाषाणात...पुराणकाळाशी नाते जोडी

इथे साधे सरळ काहीच नाही...पाण्याचे टाकेही आकंठ सजलेले...
शिवश्क्तीला वंदावे...मग पाणी भरावे...उरकावी नित्य कर्मे



सवय, सराव असेल तरच: ओल्या निसरड्या पायर्‍यांमुळे..पावसाळ्यात साल्हेर धोकादायक

तिथे उन वारा पाऊस...त्यात काही टिकतच नाही...मग ही कशाची हौस!

लालसर छटा म्हणजे तेरड्याचे ताटवे... 
सूर्याजींची समाधी सापडली आहे...हे कोण वीर असतील ज्यांना मोठा मान दिला...



अनामवीरा तुझे नाव कळेल का कधी आम्हा...

जड यंत्र आलय...उरले सुरले जीव इथले पळवून तो लावणार

तट राखण्या जल हव...तेही सुंदर सजलेले... 
टोलेजंग किल्ल्याचे जलसाठेही सुंदरतम



काय सुंदर नियोजन...वर कडा सुंदर...खाली टाके अतीसुंदर


निसर्ग इतिहास प्रेमींनो तुमच्यासाठी जांभळ्या पायघड्या...

हिरवी जांभळी टवटवी...तसूभरही कमी पडणार नाही...याची दक्षता घेती ढग! 
यथेच्छ भोजन सुरू आहे...पर्यटक येण्यापूर्वी घ्या आटोपून



फुलांनी सजल्या वाटा...अवमानू नका त्या कधीच!

थांबा...पहा...येथून फक्त वन्यजीवांनाच वाटा...तुम्ही जा वळसा मारून!

कलती ताटवे हिरवी जांभळी त्यावर तलम ढगांची नक्षी

गाव घ्या पाहून शेवटचे इथून पुढे ढगात हरवत्या वाटा...

लाल फुलांची...हिरव्या मनांची...वाट वाकडी धरू नका


शोधतो मी स्वत:स...सह्यागिरीच्या स्वर्गात


मी साल्हेर बोलतोय..,

allowTransparency="true" allow="encrypted-media">


No comments:

Post a Comment