Saturday, September 21, 2019

AARE Kalwansathi kon re


आरे...कळवणसाठी कोण रे...
आरेच्या जंगलात जितकी झाडे मेट्रो रेल्वेच्या कारशेडकसाठी कापली जाणार आहेत तितकी झाडे एखाद्या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी कापली जाणार असतील तर? सद्या कळवण ते नांदूरी या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी कित्येक मोठी झाडे कापली जात आहेत. ही संख्या शेकडोच्या घरात जाणार हे नक्की. 

साल्हेरच्या संग्रामात अतुलनिय शौर्य गाजविणार्‍या सरदार सूर्याजी काकडेंची काळाच्या उदरात हरवेली समाधी शोधून काढण्याचे मोलाचे कार्य दूर्गवीर प्रतिष्ठान, सटाणाच्या दूर्गप्रेमींनी अलिकडेच केले ते तिथल्या बागुल घराण्यातील काही जुन्या जाणत्यांकडून माहिती घेऊन. त्यांच्या समाधीचा परिसर स्वच्छ करण्याच्या उपक्रमाला हजेरी लावण्यासाठी साल्हेरला जात असताना नांदूरीवरून अभोण्याकडे न जाता आम्ही थोडी वाकडी वाट करत कळवणहून जाण्याचा निर्णय घेतला. हेतू हा की, प्रचूर मात्रेत पसरलेल्या कळवणच्या डोंगररांगांचे दुसर्‍या बाजूने दर्शन घेऊन एखादी नविन भटकंती आखावी. या प्रवासात काळीज पिळवटून टाकणारे दृष्य कळवण रस्त्याच्या दुतर्फ दृष्टीस पडले.
सुरूवातीला वाटले की, लाकूडतोड्यांनी झाडे तोडली असतील. नंतर समुळ कत्तल झालेली झाडांची मालिकाच सातमाळा रांगेशी स्पर्धा करताना दृष्टीस पडली. सह्याद्री भटकताना असे चित्र काही वेळा बघायला मिळते आणि मन सुन्न होऊन जाते.  आरेतल्या वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यासाठी सद्या मोठी चळवळ उभी राहिली. तसे भाग्य दुर्गम भागातल्या वृक्षांच्या वाट्याला येताना दिसत नाही.

नाशिकवरून निघायला आम्हाला अंमळ उशिर झाला. साडे आठ वाजता प्रस्थान केले. मोटरसायकलीने एका बाजूने ९० किलो मिटर अंतर कापायचे. समाधीचा परिसर बघून जमल्यास स्वच्छतेत सहभाग घ्यायचा अणि साल्हेरच्या सर्वोच्च माथ्यावर जाऊन त्याच दिवशी परत यायचे म्हणजे दुसर्‍या दिवशी कामावर हजर रहता येईल. ही अकस्मात ठरलली योजना खाशी व्यस्त असल्यामुळे आणि भटकंतीचा तोच उद्देश असल्यामुळे कळवणच्या रस्ता रूंदीकरणात किती झाडे कापली गेलीत, किती कापली जाऊ शकतील याचा वेध घेता आला नाही. ती कामगिरी आता त्या भागातल्या वृक्षप्रेमींनी, पर्यावरणवाद्यांनी, गडकिल्ल्यांवर हरवत चालेल्या वनसंपदेबद्दल काळजी वाटणार्‍यांनी, त्यापरिसरातील नागरिकांनी या वृक्षतोडीचा वेध घेऊन पार पाडावी.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली इतकी मोठी झाडे कापली जाणार असतील तर, किती झाडे कापली, आणखी किती कापणार, एका मोठ्या झाडाच्या बदल्यात दहापट अधिक झाडे लावली जाणार का? कुठे लावणार? त्यांची किमान पाच वर्षे कोण देखभाल ठेवणार? त्यांचे संगोपन कशा प्रकारे केले जाणार? यावर देखरेख ठेवावी.

पश्चीम घाटाची क्षमता संपलीय
झाडे काय फक्त जंगलात आहेत? ती तर सगळीकडेच. ती अविरत कमी कमी करण्याचे काम माणूस, सरकार, खाण मालक, घाट विकासक, रस्ता ठेकेदार असे चहुबाजूंनी करत चाललेत तशी त्यांच्या आश्रयाने जगणारे जीव हद्दपार होत आहेत, कायमचे नाहीसे होत आहेत. ज्या सुखासाठी माणूस हे सगळे करत आहे, तो तर दरवर्षी वाढत जाणार्‍या संकटांना आमंत्रण देत आहे. पाऊस, पूर, दुष्काळ, नापिकी, पिकांवर वाढते रोग, भाज्या, फळे, धान्यांचा विषयूक्त दर्जा अशा दृष्टचक्रात तो, गाळात रूतावा तसा रूतत चालला आहे.

अर्थात झाडांवरचे हे संकट फक्त कळवणच्या रस्त्यांपूरते नाही, जिथे जिथे रस्त्यांची कामे सुरू आहेत तिथे तिथे हेच चित्र. एक रस्ता आरेत मेट्रो कारशेडसाठी कापल्या जाणार्‍या झाडांइतकेच या एक एका रस्त्यांसाठी झाडांची आहूती घेत असावा.

भरमसाठी लोकसंख्यावाढ आणि वाहतूक वर्दीळीत कमालीची वाढ झाल्यामुळे, 'पाण्याच्या योजना' आणि 'रस्ते विकास' ही काळाची गरज आहे! असे मानणारा मोठा वर्ग हे समजून घ्यायला तयार नाही की, आपल्याकडे आपण या दोन्ही क्षेत्रात विकासाची, बांधकामाची कमाल पातळी गाठली आहे. म्हणाल तर त्याची छोटीशी चुणूक यंदा कोल्हापूर, सांगली, सातार्‍याच्या पुराने दाखवून दिली.

पश्चिम घाटात रस्ते विकासाची कमाल पातळी गाठली गेली आहे. हे रस्ते पर्यावरणस्नेही नाहीत. त्यामुळे मोठा पाऊस झाला की, हेच रस्ते धरणाच्या भिंतीसारखे काम करतात. महामार्गाच्या रस्त्यांचा विचार केला तर ती कैक किलोमिटर लांब पसरलेली भिंत तयार होतो. त्याखालून पाणी पलिकडे वाहून जाण्याचा व प्राण्यांच्या निष्कासन मार्गांचा कोणताच अभ्यास न झाल्याने आधुनिक अभियंत्यांनी जीवनवाहिनी रस्त्यातून मरणवाहिन्या बनवल्यात.
काय बिघडले असते जर रस्ते बांधताना त्याच्याखालून पाण्याच्या निष्काशनासाठी व प्राण्यांच्या निष्कासनासाठी योग्य अंतराने मोठे व मोठ्या संख्येने निष्काषन मार्ग (under passes) तयार केले असते. आपण पैसा वाचविताना निसर्ग आपल्याला एक दिवस धडा शिकवेल याचा कोणताच विचार केला नाही. इथे सगळा विचार माणून नावाच्या प्राण्याचा. तो तर इतर सर्व प्राण्यांपेक्षा स्वत:ला वेगळा समजू लागला आहे. सामना १ विरुद्ध ९९ आसा कमालीचा विषयम. तरीही हा एक सगळ्यांना भारी ठरू पाहत आहे तो एक टक्का!

कमाल पातळी पाणी योजनांची
घाट, रस्ते, महामार्ग, शहरे नी गावातले रस्ते हे मृत्यूचे सापळे बनल्याचे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. तीच गत पाणी योजनांची. औरंगाबादेत नुकतीच मराठवाडा पाणी परिषद झाली, त्यात भारतातील नदीजोड प्रकल्पाचा पहिला प्रयोग राबविणारे माजी सनदी अधिकारी भास्कर मुंडे यांनी त्यांची निरिक्षणे नोंदविली, महाराष्ट्राने पाणी योजना राबविण्याचे शिखर गाठले गेले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी अडीचशे योजना. यातील कित्येक योजना या पावसाअभावी कारड्या. त्याने माणसाची पाण्याची गरज भागू शकत नाही की, दुष्काळ संपु शकत नाही. नव्या योजनांसाठी पैसा नाही. जमिनही नाही.

झाडांमुळे फक्त शुद्ध हवा मिळते? पाने, फळे, फुळे मिळतात? त्यावर फक्त पक्षीजीवन? लहान मोठ्या जिवांची ती आश्रयस्थाने? वृक्ष, वेली, झुडपे जमिनीत पाणी मुरविण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. बाबांनो भरमसाठ विंधन विहीरीतून (borewells) अविरतपणे पाण्याचा उपसा सरू आहे. माणूस आपल्या गरजा भागविण्यासाठी जितके पाणी उपसतो, त्याच्या फक्त ७ टक्के पाणी जमिनीत पुनर्भरण केले जात आहे. पृथ्वीतलावरचे एकुण एक जीव हे सृष्टीचक्राचा भाग बनून जमिन सुपिक बनविण्यात, झाडे, वेलींना व एकमेकांचे अन्न निर्माण करण्याचे काम करतात तद्वताच ते जमिनीत पाणी मुरविण्यासाठी त्यांच्या नित्यकर्मातून सहाय्य करतात.
प्राणी, पक्षांच्या मलमुत्रांतून जमिनीत सुक्ष्म जीव, काही माठे किडे निर्माण होतात, त्यांच्या नित्य जगण्यातून जमिन भूसभूशीत बनते व ती पाणी मुरविण्याचे काम करते. आपल्याला फक्त गांडूळ ठाऊक आहे. तो जमिन सुपिक बनविणारे आणि कैक मिटर खोलवर खड्डे खणून पाणी मुरविणारा सगळ्यात बादशाह जीव. पण त्याच्यापेक्षा कमी अधिक सहाय्यभूत हे सगळेच जीव ठरतात. वाघ, सिंह, हत्ती आदी मोठे जीव तर ठरतात, पण डोळ्यांना न दिसणारे जीव सुद्धा जमिनीत पाणी मुरविण्याच्या प्रक्रियेला सहाय्यभूत ठरतात. चोविस तासांच्या सरासरी पावसात एक दहा वर्षांन अधिक जुने झाड एक पाण्याच्या टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरविण्याचे काम करते, असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

हे तत्थ्य यापूर्वीच सांगितले गेले आहे की, पृथ्वी ७१ टक्के पाण्याने वेढली आहे, त्यामुळे सरासरी ७१ टक्के पाऊस हा समुद्रात पडतो. जमिनीवर तीसच टक्के पाऊस पडू शकतो. त्यातील ९६.५ टक्के पाणी हे समुद्र व महासागरात समाविष्ट आहे. १.७ टक्के भूगर्भात तर १.७ टक्के बर्फरूपात गोठलेल्या अवस्थेत आहे. सजिवांकरिता उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी १ टक्का पाणी हे नद्या, नाले, धरण, बंधारे, तलाव आदीयंच्या माध्यमातून उपरलब्ध आहेत तर ३० टक्के पाणी हे भूगर्मात.

गेल्या पन्नास शंभर वर्षात माणसाने यातीले १ टक्का पाणी मिळविण्यासाठी अब्जावर्धी, खर्वावधी रकमा खर्च केल्या. विंधन विहीरी आणि अत्याधुनिक पंप बसवून भुगर्मातून बेसुमार उपसा केला, पण पूनर्भरण मात्र ७ टक्के इतके घटत गेले. त्यामुळे जमिनीखालचे जलस्तर हे धोकादायकरित्या खालावले आहे. ते वाढविण्याची प्रक्रीया आज या घडीला सुरू केली तर त्याला पुढच्या चाळीस पन्नास वर्षांचा काळ लागणार आहे. काही वेळेला पाऊस झाला नाही तरी भूगर्भातले हे पाणी माणसासाठी उपकारक ठरायचे ते विहीरींच्या माध्यमातून. आता ती सोयच माणसाने स्वत:च्या हातून बिघडवून टाकली आहे.
माणसाने घरांचे पाणी जमिनीत पुनर्भरण केले तर ते फायद्याचे आहे. पण त्याही पेक्षा जास्त उपयूक्त आहे ते जमिनीत पाणी मुरविणारे कारखाने. अगदी फुकट काम करणारे. जंगलातली किंवा शेतातली एक ग्रॅम सजिव माती घेतली तर त्यात ३३ कोटी सुक्ष्मजिवाणू असतात. ते जशी जमिन भूसभूशीत व सुपिक बनवतात त्याच सोबत पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या चक्राचा भाग बनते.
जोवर जमिनीवर पाला, पोचोळा रूपी कर्बाचे आच्छादन होते तोवर पाणी मुरविणारे हे कारखाने अविरतपणे काम करत होते. आता जंगले कमी झालीत. गवतीमाळ घटले. इतकेच काय डोंगरमाथ्यावरचे सगळेच्या सगळे गवत कसे कापून नेता येईल किंवा चराई करता येईल याकडे कल वाढला आहे. मागच्या वर्षी आमच्या आठ दिवसांच्या सातमाळा डोंगरयात्रेत हे चित्र जवळून बघायला मिळाले.

झाडे तोडू नकाच. डोंगर व त्या परिसलातली वृक्षसंपदा म्हणनू खालच्या वाडी, वस्त्यांकरिता जमिनीत पाणी मुरविणारी अनन्यसाधारण महत्व असलेली ही नैसर्गिक यंत्रणा आहे. सह्याद्रीत बहुतांशी डोंगर परिसरात ८० टक्क्यांच्या वर वृक्षतोड झाली आहे. सातमाळा डोंगर रांगेत हे प्रमाण भयावहरित्या मोठे आहे. झाडे म्हणजेच खरा विकास, झाडे म्हणजेच पाणी.

आरेचे जंगल वाचवा! कळवण रस्त्यावरची झाडे वाचवा! 
रस्त्यांचे जाळे कमी करा!
घाट रस्ते बांधणे थांबवा!
नव्याने खाणी बंद करा!
नदीतली वाळू उपसा पूर्णपणेबंद करा!
मोठ्या रस्त्यांच्या खालून पाणी व वन्यजिवांचे 
पुरेशा संख्येत नियमीत निष्काशसन मार्ग बनवा...


तोरणमाळ: वृक्षांचे नृशंस हत्याकांड करून थाटले जात आहेत घाटरस्ते आणि रिसोर्ट

कमळगड उन्हाळ्याच्या मध्याचा...जावळीचे जंगल अजूनही काही प्रमाणावर शाबूत

कमळगड: झाडांचा पाल पाचोळा...या खाली राबतात अगणीत पाणी मुरविणारे नैसर्गिक कारखाने

तांबोळ्यावरून दिसणार सेलबारी डोलबारी रांगेतले उजाड डोंगर

मार्कंडेय: डोंगरांच्या माथ्यावर वर्षभर पाणी मिळते...

तिवारी वस्ती, जावळ्या: डोंगरमाचीवर भरपूर वृक्षसंपदा टिकून...म्हणून टाक्यात पाणी

राजदेर: डोंगरांवर चर खोदून पाणी मुरविण्यापेक्षा झाडे वाढवून मुरविणे विनाखर्च व फायद्याचे

राजगड: दृष्ट न लागो...चंद्राला लाजविणारे चंद्रकोर टाके...महाराज _ /\ _

राजगड: बालेकिल्ल्यावर सुद्धा वर्षभराचा पाणीसाठा शक्य त्यावेळच्या अपार वृक्षसंपदेमुळे

फाशीचा डोंगर, नाशिक: वनखाते अशा चर खोदतात हे ठिक पण त्यावर भरपूर पैसा व श्रम खर्च होतात...त्याला खुप मर्यादाही!

ब्रम्हगिरी: ज्ञानदेवो म्हणे वृक्षही वृक्ष न होणें। असोनी नसणें सुमनीं जैसा।। 
सोनगीर: शिखरावरील भागाच चुना मातीच्या नळीतून पाणी नेण्याची पुरातन व्यवस्था


कात्रा खिंडीतले टाके

ममदापूर: मुलांना जलसंवर्धनाचे संस्कार...वृक्षरोपणाचे संस्कार देणे काळाची गरज

कात्रा: कळसुबाई हरिश्चंद्रगड परिसरातले वनक्षेत्र

कलाडगडाच्या पश्चिम बाजूस असलेली मुळा नदी


कोळेश्वर पठार: उन्हाळ्यात सुद्दा डोंगरावर पाणी वाहते ते भरपूर झाडीझाडोर्‍यामुळे



No comments:

Post a Comment